दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला असून नाशिक शहर व निफाड भागातील ओढायला यांची पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने चार ऑगस्ट रोजी गोदावरीत ३६ हजार ७३१ व्युसेक सुरू झाला होता तो दुपारी बारा वाजता ४४७६८ व्युसेक इतका केल्यामुळे गोदावरी नंदी कोपरगाव येथे तुडुंब भरून वाहती झाली हे पाणी जायकवाडी धरणाच्या फुगवट्यात पोहचत आहे
४ ऑगस्ट रोजी जायकवाडी जयाश्यात १५,,१८५ पाण्याची आवक सुरू होती या जलाशयात ११,२० इतका उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच उपयुक्त साठा ८ .५ टीएमसी इतका तर मृत एकुण साठा ३४,६ . टीएमसी इतका झाला आहे रात्रीतून जास्तीचे विसर्ग या धरणात सामावण्यास सुरवात होईल जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील जनतेच्या विकासात परिवर्तन करण्यात मोठा वाटा असला तरी या धरणामुळे हजारो लोकाच्या जमीणी संपादीत केल्या गेल्या हजारो लोक भुमिहीन व प्रकल्प ग्रस्त झाले असून हे लोक आपली गावे सोडून परागंदा झाली आहे ह्या धरणाचे काम १९७२साली पुर्ण झाले होते
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List