माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!

माजी सरपंचाचा कुजलेला मृतदेह आढळला; लोणार तालुक्यात खळबळ२५ दिवसांपासून होते गायब हत्या झाल्याच्या संशय..!

आधुनिक केसरी न्यूज

 प्रणव वराडे 

लोणार : तालुक्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. लोणार शहरातील हिरडव रोडवर हा मृतदेह सापडला..अशोक आबाजी सोनूने (६०, रा. वढव, ता.लोणार) यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे..अशोक सोनुने वढव गावचे माजी सरपंच असून गेल्या १४ मे पासून ते गायब होते... अशोक सोनुने गायब असल्याची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.  दरम्यान काल सायंकाळी शहरातील हिरडव रोडवर एक कुजलेल्या आणि दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तो मृतदेह अशोक सोनुने यांचा असल्याची ओळख पटली.. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.. मृतदेह अतिशय छिन्नविच्छन्न अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विविध अँगलने तपासाला सुरुवात केली आहे, हा मर्डर असल्याचा काहीसा संशय असल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे...

_________________________

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग