राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प

राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देत रस्ते, विज, आरोग्य , शिक्षण, पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव तरतूद करुन राज्याला तिव्र गतीने विकसित करणारा अर्थसंकल्प

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : आज दि.१० मार्च २०२५ रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ११ वा राज्याला विकसित भारताच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्राची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पात राज्यातील सर्व समाजघटकांसाठी विविध विभागांकडून सुरू असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. रस्ते, विज, आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करुन राज्यातील जनतेचे जिवनमान सुसह्य करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करुन राज्याला उद्योगस्नेही बनवत राज्यातील तरुण युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे पाऊल टाकलेले आहे. तसेच नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुबलक सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी धोरण आखण्यात आल्याबद्दल आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी शासनाचे आभार मानत अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत इतवारा पोलिसांनी प्रभावी कारवाई करण्यात आली असून...
Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न
नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ