सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेळगाव गौरी येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेळगाव गौरी येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

तानाजी शेळगांवकर 

   नायगाव  : कधी कमी तर कधी अति पाऊस होऊन सततची शेतकऱ्याची शेतातील पिकांची होणारी नापीकी यामुळे डोक्यावर वाढणाऱ्या कर्जाला कंटाळून नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील सतबा पिराजी वाघमारे वय 55 वर्षे या शेतकऱ्यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
     शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील अतिशय कष्टाळू असलेले सतबा पिराजी वाघमारे यांना दोन पत्नी व एकच मुलगी असा त्यांचा परिवार असताना ते आपल्या परिवाराचा गाडा शेतीवर सांभाळत होते. एकुलती एकच मुलगी असल्याने तिला शिक्षणासाठी शाळेत पाठवले जात होते ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना सतबा व त्यांच्या दोन्ही पत्नी शेतात कष्ट करायचे परंतु शेतात वर्षभर कष्ट करूनही घातलेले पैसेही निघत नसल्याने सततच्या या नापिकीमुळे वरच्यावर कर्ज वाढत जात होते यामुळे तो नेहमी बेचैन असायचा.
     सततची नापिकी व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून सतबा वाघमारे यांनी दि.9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने त्यांच्यावर शेळगाव गौरी येथे सायंकाळी चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि एक मुलगी असुन वाघमारे यांच्या अकाली दुःखद निधनामुळे वाघमारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग