सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेळगाव गौरी येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेळगाव गौरी येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

तानाजी शेळगांवकर 

   नायगाव  : कधी कमी तर कधी अति पाऊस होऊन सततची शेतकऱ्याची शेतातील पिकांची होणारी नापीकी यामुळे डोक्यावर वाढणाऱ्या कर्जाला कंटाळून नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील सतबा पिराजी वाघमारे वय 55 वर्षे या शेतकऱ्यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
     शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील अतिशय कष्टाळू असलेले सतबा पिराजी वाघमारे यांना दोन पत्नी व एकच मुलगी असा त्यांचा परिवार असताना ते आपल्या परिवाराचा गाडा शेतीवर सांभाळत होते. एकुलती एकच मुलगी असल्याने तिला शिक्षणासाठी शाळेत पाठवले जात होते ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना सतबा व त्यांच्या दोन्ही पत्नी शेतात कष्ट करायचे परंतु शेतात वर्षभर कष्ट करूनही घातलेले पैसेही निघत नसल्याने सततच्या या नापिकीमुळे वरच्यावर कर्ज वाढत जात होते यामुळे तो नेहमी बेचैन असायचा.
     सततची नापिकी व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून सतबा वाघमारे यांनी दि.9 जानेवारी रोजी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने त्यांच्यावर शेळगाव गौरी येथे सायंकाळी चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि एक मुलगी असुन वाघमारे यांच्या अकाली दुःखद निधनामुळे वाघमारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..!  गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या गद्दार खासदारांची युवा सेनेचे...
नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!
विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!
दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल