बल्लारपूर नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? : रविभाऊ पोप्पलवार. 

बल्लारपूर नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? : रविभाऊ पोप्पलवार. 

आधुनिक केसरी न्यूज 

बल्लारपूर : शहरातील नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबत आम आदमी पक्षातर्फे मागल एप्रिल महिन्यात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. पुन्हा जुलै च्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट  घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनियमितपणे कर्मचाऱ्यांमध्ये अधिकारांचे वाटप करण्यात आले आहे. थेट वर्ग 4 चे कर्मचारी विभागप्रमुख बनवले गेले आहेत व त्यांच्या हाताखाली वर्ग 3 चे कर्मचारी काम करत आहेत. अनेक विभागात लिपिक नाही, उप मुख्याधिकारी यांना काही माहीत नाही नागरिकांची गैरसोय होत आहेत. बदलीविना अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नोकरीला आहेत. पुर्वी शिक्षण विभागाची जबाबदारी प्रवासकिय अधिकाऱ्यांकडे राहत असे परंतु आता हि जबाबदारी एका शिक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. आधीच शिक्षकांची संख्या कमी आहे. तर शिक्षकांनी शिकवायचे कि इतर जबाबदारी सांभाळची. हि सर्व तक्रार त्या निवेदनात करण्यात आली. तरीही दोनदा निवेदन देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी इतक्या गंभीर प्रश्नाबाबत दुर्लक्ष करने फारच दुर्दैवी असल्याचे रविभाऊ पुप्पलवार यांनी म्हटले. यासोबतच प्रशासक म्हणून असलेले मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हाधिकाऱ्यांचे समर्थन आहे का? अनेक वर्षांपासून नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांची बदली का झालेली नाही? असे प्रश्न आपचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त विद्यार्थ्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट  संवाद...
सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक