पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
आधुनिक केसरी न्यूज
कुडूत्री : कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथील पत्रकार अविनाश तराळ यांना सापडलेले वीस हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम असणारे पाकीट परत करत प्रामाणिकपणा जपला. एक वेगळाच आदर्श निर्माण केला व त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रकार अविनाश तराळ हे शाळेतून घरी येता असताना त्यांना चंद्रे - कसबा वाळवे मार्गांवर पाकीट सापडले. बाजूला कोण आहे का?, कोण शोधत येते का? हे पाहण्यासाठी ते थोडा वेळ तिथेच थांबले,पण कोणीच जवळपास आले नसल्याचे पाहून व पावसाची संततधार असल्यामुळे ते घरी गेले.घरी जाऊन त्यांनी पाकीटमधील ओळखपत्राच्या आधारे ते पाकीट चंद्रे येथील वैभव रघुनाथ पाटील या व्यक्तीचे असल्याचे समजले. तराळ यांनी त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधून या घटनेबद्दल माहिती सांगताच त्यांची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर पाकीट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाकीट आपल्याकडे असल्याचे सांगून घेऊन जाण्यासाठी सांगतिले. वैभव पाटील यांचा कालच पगार झाला होता. त्यामुळे एका महिन्याच्या श्रमाचे पैसे पाकिटामध्ये तसेच होते. तर औषध दुकानात औषधे आणण्यासाठी गेले असताना रस्त्यावर पाकीट पडले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.घरी येऊन वैभव पाटील यांनी पत्रकार तराळ यांचे आभार मानून पाकीट नेले. पत्रकार अविनाश तराळ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे सर्वत्र कौतुक आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List