पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र,गोंडवाना गडचिरोली उद्घाटन सोहळा संपन्न
कल्याणकारी राज्यासाठी उत्तम प्रशासाक अहिल्यादेवी होळकर - कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे
आधुनिक केसरी न्यूज
गोंडवाना : तीनशे वर्षानंतरही आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत आहोत ती केवळ औपचारिकता नाही. कल्याणकारी राज्य कसे चालवायचे याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर अहिल्यादेवींनी घालून दिला आहे त्यामुळेच देशातील कल्याणकारी राजांबरोबर अहिल्यादेवी चे नाव घेतले जाते. अहिल्यादेवी चे कार्य देशभर आहे हिंदू धर्म जागृत ठेवण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण राज्य माझा परिवार आहे माझी जबाबदारी आहे असे मानत त्यांनी काम केले. अहिल्यादेवींनी वंचितांसाठी राज्य चालवले. उत्तम शासक तोच असतो जो उत्तम प्रशासक आणि प्रजाहित दक्ष असतो. स्वतःच्या हिताचा, व्यक्तिगत सुखाचा विचार न करता काम करणारा शासक लोकप्रिय असतो, हे अहिल्यादेवीनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले.
असे गौरवोद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी काढले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या" उद्घाटन सोहळा ,कुलगुरु डॉ. प्रशात बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली, तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे ज्येष्ठ विधीज्ञ अँड.रवींद्रजी भागवत, व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य,प्रस्तावक गुरुदास कामडी,डॉ. संजय गोरे,डॉ. अनिल चिताडे,अधिसभा सदस्य यश बांगडे, संजय रामगिरवार जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तर प्रमुख वक्ता म्हणून वीर रस कवयित्री शौर्या मौर्य यांच्या उपस्थितीत " संपन्न झाला. अहिल्यादेवींनी महिलांच्या कल्याणासाठी आणि अधिकारासाठी लढा दिला. समाजात महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी होणाऱ्या विविध प्रयत्नांना पाठिंबा दिला. शिक्षणाला चालना दिली. अनेक धर्मदाय कार्य केले, यासाठी मातृशक्तीचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे अशी भावना प्रमुख अतिथी अँड. रवींद्रजी भागवत यांनी व्यक्त केले. अहिल्यादेवी होळकर भारतीय वारशाच्या संरक्षक आहेत. देशातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रावर हल्ले होत असताना त्यांनी त्याचे रक्षण केले. अहिल्यादेवी यांचे तत्त्वज्ञान असलेला नागरिक देवो भव या मंत्रावर आपण काम केले पाहिजे. एक समर्पित हिंदू म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतात अनेक मंदिर बांधण्याचे कार्य केले. अहिल्यादेवी होळकर यांना भारतीय इतिहासात एक आदर्श मानले जाते आणि त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीने एक प्रेरणादायी वारसा कायमचा मागे सोडलेला आहे. देशभक्तीची भावना आणि त्यांनी ज्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याचे रक्षण करण्याचे करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवरती येते. म्हणूनच त्यांचे विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. असे आवाहन प्रमुख वक्ता शौर्या मौर्य यांनी कले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा स्थापन करण्यात आलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन" केंद्राच्या उद्घाटना सोहळा दिनांक ३१ मे २०२५ रोजी, प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे संपन्न झाला. अध्यासनाचे प्रस्तावक गुरुदास कामडी यांनी अध्यासनाची भूमिका स्पष्ट केली. हे अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याचे संशोधन. ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन, उपक्रम, व्याख्यान ,लघु संशोधन अशा विविध कार्यक्रम व उपक्रम अध्यासन केंद्रातून राबविले जाणार आहेत. समाजातील सर्व घटकांपर्यंत अहिल्यादेवींच्या कार्यांचेक्ष विचारधन पोहोचवण्याचे कार्य या अध्यासनाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे,असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण गिलबिले यांनी केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List