अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान 

अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान 

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी : श्रध्दा  सबुरी व जगाला सर्व धर्म समभावाची  शिकवण देणा-या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची मोठी श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. ५ ऑक्‍टोबर रोजी मुंबई, महाराष्‍ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी एक कोटी रूपये किमतीचे  १ किलो ४३४ ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम व कलाकुसर केलेली सोन्‍याची पंचारती अर्पण केली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
गाडीलकर म्हणाले की  पंचारतीची किंमत जवळपास सुमारे १ कोटी रुपये असून ही सुंदर नक्षिकाम असलेली समई साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आली. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. 
तसेच, मागील आठवड्यात देखील  हैद्राबाद येथील एका साईभक्ताने  आपल्या श्रध्देपोटी   साईबाबा संस्थान कडे १ कोटी ८ लाख रुपये किमतीचा डिमांड देखील  ड्राफ्ट प्राप्‍त झाला आहे. दिवसेंदिवस साईबाबा संस्थानकडे सोने दागदागिने  जडजवाहीर सह रोख रक्कम धनादेश या माध्यमातून दानराशि देणगी स्वरुपात प्राप्त होत आहे यात गुप्त दान देण्यात देखील काही साईभक्त समाधान प्राप्त करत असतात.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!  नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार