नीट २०२४ निकालात महाराष्ट्रात आयआयबीच अव्वल ...!

१०० टक्के ओरिजनल निकालामुळे विद्यार्थी पालकांना आयआयबीचा विश्वास…!

नीट २०२४ निकालात महाराष्ट्रात आयआयबीच अव्वल ...!

आधुनिक केसरी न्यूज 

लातूर /  नांदेड  : लातूरच्या शैक्षणीक क्षेत्रात गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण करून त्याचा दबदबा संपूर्ण राज्यात केलेल्या व 
महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळख निर्माण केलेल्या  आयआयबीने ४ जून रोजी जाहीर झालेल्या नीट २०२४ च्या निकालात ऐतिहासिक कामगिरी करत गुणवत्तेचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या वर्षीच्या निकालात आय आय बी इन्स्टिट्यूटचा सिंद्धात राख याने ७१० गुण मिळवत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहे तर यासोबतच आयआयबी च्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आय आय बी ने आपली गुणवत्ता सिद्ध करत नवा गुणवत्तेचा बेंचमार्क सेट केला आहे.
     आयआयबीच्या ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत ऋुषीकेश गायकवाड ७०५ , ओम येसने ७०५ , कु.प्राजक्ता भगत ७०० , महेश सत्यधर ७०० , कु.सानिया मिरजे ७०० या विद्यार्यांनी बाजी मारली असून याशिवाय  इन्टिट्यूटच्या तब्बल २२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी ६५० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत यासह फिजिक्स , केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत निकालावरून नीट २०२४ च्या निकालात महाराष्ट्रासह देशात गुणवत्तेचा अमीट ठसा आयआयबी इन्स्टिट्यूटने उमटविला आहे . या कामगिरीच्या बळावर याही वर्षी आयआयबी हे महाराष्ट्रातून एमबीबीएसला सर्वाधिक विद्यार्थी पाठविणारे इन्टिट्यूट ठरणार आहे. सलग २५ वर्षापासून "आयआयबी आहे तर विश्वास आहे" हे वाक्य केवळ बिरुद नाही तर या निकालाने ते सिद्ध देखील झाले आहे. त्यामुळे आय आय बी संधर्भात गुणवत्तेचा ओरिजनल विश्‍वास हे समीकरण आणखी बळकट होत आहे. दरवर्षी मे महिन्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए कडून या परिक्षेचे आयोजन केले जाते. 
-------------------------------------
यावर्षीही ५ मे रोजी देशभरात ही परीक्षा पार पडली आहे.नीटचा निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यात सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.तसेच ६५० पेक्षा अधिक गुण घेणारे २२५ पेक्षा जास्त विद्यार्थी असून यावर्षीही आयआयबी च्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश मिळेल असे संचालक दशरथ पाटील यांनी निकालावर प्रतिक्रिया देतांना सांगितले.
----------------------------

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..! साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज  नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत...
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन