मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
आधुनिक केसरी न्यूज
शेगांव : दि. १४ येथील मंदिर परिसरातील बहुप्रतिक्षित भू-संपादनाची प्रक्रिया अखेर दुसऱ्या दिवशी शांततेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. पहिल्या दिवशी निर्माण झालेला कोंडीचा प्रश्न आज (१४ जुलै) नगर परिषद प्रशासन आणि बाधित १७ दुकानदार /घरमालक यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर सुटला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक 'विशेष बाब' म्हणून प्रशासनाने दुकानदारांना मालकी हक्काने पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिल्या दिवशी (१३ जुलै) १७ खाजगी मालकीच्या जागा संपादित करण्यात नगर परिषदेला यश आले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी सकाळीच नगर परिषदेचे पथक १५ पोलीस अधिकारी आणि १५० कर्मचाऱ्यांच्या प्रचंड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, दुपारी १२:३० वाजेपर्यंत घटनास्थळी ना मुख्याधिकारी पोहोचले होते ना दुकानदार. यामुळे कारवाई नेमकी कुठे रेंगाळली, याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या दरम्यान, बाधित दुकानदारांनी थेट शेगाव नगर परिषद गाठून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली होती. दुकानदारांची स्पष्ट मागणी होती की, जर नगर परिषद नवीन व्यापारी संकुलात आम्हाला मालकी हक्काने दुकाने खरेदी करून देत असेल, तर आम्ही स्वतःहून ही जागा मोकळी करून देऊ. सामान्यतः नगर परिषद आपली जागा कोणालाही मालकी तत्त्वावर देत नाही. परंतु, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवून ही अट 'अपवाद' (एक्सेप्शनल केस) म्हणून मान्य करण्यात आली. दुपारच्या सत्रात या १७ दुकानदारांनी चर्चेसाठी वेळ मागितला आणि अखेर सर्व जण या प्रस्तावावर सहमत झाले. काही दुकानदारांनी याला पूर्ण संमती दिली, तर काहींनी बेमनस्कपणे (नाईलाजाने) होकार दिला
डोळ्यात पाणी, पण सहकार्याची भूमिका : करार निश्चित झाल्यानंतर नगर प्रशासनाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रशासनाच्या निर्णयाचा मान ठेवत दुकानदारांनी स्वतःहून आपली दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही संवेदनशीलता दाखवत त्यांना सामान सुरक्षितपणे हलविण्यास मदत केली. गेल्या ४ पिढ्यांपासून या ठिकाणी स्थायिक असलेल्या कुटुंबांमधील महिलांचा आक्रोश आणि भावनांचा कल्लोळ मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता. वर्षानुवर्षांचे राहते घर आणि व्यवसाय सोडताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले, परंतु कायद्याचा आणि न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत सर्वांनी मूकपणे आपले साहित्य हलवले. गेल्या ४ पिढ्यांपासून या ठिकाणी स्थायिक असलेल्या कुटुंबांमधील महिलांचा आक्रोश आणि भावनांचा कल्लोळ मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता. वर्षानुवर्षांचे राहते घर आणि व्यवसाय सोडताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले, परंतु कायद्याचा आणि न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत सर्वांनी मूकपणे आपले साहित्य हलवले.
मालकी हक्क हस्तांतरण प्रक्रिया सुरू : या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर-बोराडे यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध रिट याचिका आणि आदेशांचा संदर्भ देऊन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या गाळेधारकांना न.प. समोरील दुकानसमुहात गाळे वाटप झाले आहेत, त्यांनी मालकी हक्क हस्तांतरण आणि नोंदणीकृत खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहावे व तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी.
थोडक्यात महत्त्वाचे : मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेले हे भू-संपादन अखेर कोणताही वाद न होता, सामोपचाराने पूर्ण झाले आहे. दुकानदारांच्या हक्काचे रक्षण करत प्रशासनाने घेतलेला हा संवेदनशील निर्णय या मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List