पैठणमधे पुर परिस्थिती, सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : शहरातील सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हालवले असुन शहरातील नाथ हायस्कूल, कन्या शाळा, मुलांची प्रशाला, शालीवाहन विद्यालय, प्रतिष्ठान महाविद्यालय, तसेच मंगल कार्यालय या ठिकाणी जवळपास 150 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी दिली. दरम्यान शाळेत स्थलांतर केलेल्या नागरिकांना आमदार विलास भुमरे यांनी भेटी देवुन महसूल व नगर परिषद च्या आधिकार्याना सुचना देवुन नागरिकांना दिलासा दिला. या नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी कुणाची ईच्छा असेल त्यानी ऩप. शी संपर्क करावा. 2006 च्या पुर परिस्थिती पाहता शहरातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याने दुपारी 2 च्या वेळी जायकवाडी धरणात दोन लाख तीस हजार आवक येत असल्याने रविवारी सकाळ पासुन टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येवुन एक लाख 80 हजार विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आल्याने गोदावरीने रौद्र रूप धारण केले आहे.पैठण शहरातील परिस्थिती पाहता नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकांनी नगर परिषद पैठण हेल्प लाईन क्रमांक ८६२३८६०१८४ या क्रमांकावर फोन करून आपत्कालीन परिस्थितीची माहिती कळवावी. तसेच नेटवर्कची मदत अन्नदान तसेच इतर प्रकारची मदती साठी संपर्क. नगर परिषद पैठण.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List