पैठणमधे पुर परिस्थिती, सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले 

पैठणमधे पुर परिस्थिती, सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके 

पैठण :  शहरातील सखल भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हालवले असुन शहरातील नाथ हायस्कूल, कन्या शाळा, मुलांची प्रशाला, शालीवाहन विद्यालय, प्रतिष्ठान महाविद्यालय, तसेच मंगल कार्यालय या ठिकाणी जवळपास 150 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती पैठण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी दिली. दरम्यान शाळेत स्थलांतर केलेल्या नागरिकांना आमदार विलास भुमरे यांनी भेटी देवुन महसूल व नगर परिषद च्या आधिकार्याना सुचना देवुन नागरिकांना दिलासा दिला. या नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी कुणाची ईच्छा असेल त्यानी ऩप. शी संपर्क करावा. 2006 च्या पुर परिस्थिती पाहता शहरातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याने दुपारी 2 च्या वेळी जायकवाडी धरणात दोन लाख तीस हजार आवक येत असल्याने रविवारी सकाळ पासुन टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात  येवुन  एक लाख 80 हजार विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आल्याने गोदावरीने रौद्र रूप धारण केले आहे.पैठण शहरातील परिस्थिती पाहता नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकांनी नगर परिषद पैठण हेल्प लाईन क्रमांक ८६२३८६०१८४ या क्रमांकावर फोन करून आपत्कालीन परिस्थितीची माहिती कळवावी.  तसेच नेटवर्कची मदत अन्नदान तसेच इतर प्रकारची मदती साठी संपर्क.  नगर परिषद पैठण.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले