ग्राम वडशींगी येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप संपन्न

ग्राम वडशींगी येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप संपन्न

आधुनिक केसरी न्यूज

जळगाव जा : 28 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील   वडशिंग येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप करण्यात आला.आषाढ पौर्णिमा दिनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पठणाची सुरुवात करण्यात येते . विहारामध्ये उपासक उपासिका आणि सहानु बालक या सर्वांनी मिळून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण केल्या जाते जवळजवळ तीन महिने हा ग्रंथ पठण केल्या जातो आणि शेवटी या ग्रंथाचा समारोप वंदना, बुद्ध वंदना आणि सरनतय गाथा घेऊन या कार्यक्रमाची सांगता केल्या जाते आणि नंतर भोजनदान दिले जाते. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ पठण समारोपाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक आणि त्याची कार्यकारणी यांनी सुद्धा भेट दिली तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर आणि त्यांची कार्यकर्ते यांनी सुद्धा भेट दिली. ग्रंथाचे पठण निरंजन भगत यांनी केले. यावेळी  मधुकर भगत, पंजाबराव भगत, कैलास भगत लोकपाल भगत, भास्कर भगत, नितीन भगत, भाग्यश्री लोकपाल भगत, सुमन भगत, पर्वताबाई भगत, तसेच रमाई महिला मंडळ वडशिंगी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. तसेच या ग्रंथ समारोपाला पूजनीय भंते यांची सुद्धा उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक वंचित नेते साहेबराव भगत,तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, एडवोकेट सावळे,डॉ वाकोडे, पत्रकार उत्तम वानखडे, समता सैनिक दल सैनिक, वंचित बहुजन आघाडी महिला माजी तालुकाध्यक्ष वंदनाताई भगत, भीमराव वानखडे. सरपंच पती सुनील वानखडे,तसेच ग्राम  वडशिंगी येथील उपासक उपासिका आणि सहान बालक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले