जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
घनसावंगी : जायकवाडी धरणातून सिंचनासाठी डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळा सुरू असून देखील तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.यामुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे संकट उभे राहिले आहे.तसेच ग्रामीण भागात तलाव व बॅरेज पूर्णत:रिकामे असल्याने पाळीव प्राणी व मुक्या जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील मौजे पाथरवाला,साडेगाव, मंगरूळ व शिवणगाव या बॅरेजमध्ये जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामध्ये शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी केली आहे.यावर राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List