जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी 

आधुनिक केसरी न्यूज

घनसावंगी : जायकवाडी धरणातून सिंचनासाठी डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळा सुरू असून देखील तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.यामुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे संकट उभे राहिले आहे.तसेच ग्रामीण भागात तलाव व बॅरेज पूर्णत:रिकामे असल्याने पाळीव प्राणी व मुक्या जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील मौजे पाथरवाला,साडेगाव, मंगरूळ व शिवणगाव या बॅरेजमध्ये जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामध्ये शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी केली आहे.यावर राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी  जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी 
आधुनिक केसरी न्यूज घनसावंगी : जायकवाडी धरणातून सिंचनासाठी डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी राज्याचे जलसंपदामंत्री...
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार : गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
साक्री पोलिसांची १५ वाहनांवर कारवाई; पहिल्याच दिवशी अकरा हजाराचा दंड वसूल
गोंदिया जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथकाची राज्यसीमेवर मोठी कारवाई ; 43 हजारांचा खत साठा जप्त
बस- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, चिमुकली बचावली
राहुरीत विवाहित तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या !