अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान : खासदार भगरे यांची पंचनाम्यांची मागणी..!
आधुनिक केसरी न्यूज
पेठ : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा, आंबा, टोमॅटो व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार भगरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सतत सुरू आहे. त्यामुळे शेतांमध्ये उभ्या असलेल्या व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा पीक सध्या काढणीच्या अवस्थेत असून, काढणी झालेला कांदा शेतातच असताना पाण्याने भिजून खराब होत आहे. तरीही महसूल यंत्रणा अशा कांद्याचा पंचनामा करत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे."शेतात असलेला कांदा कोणत्याही अवस्थेत असो – उभा किंवा काढणी केलेला – त्याचा पंचनामा करणे आवश्यक आहे. सर्वच प्रकारच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला तातडीने द्यावेत," अशी ठाम मागणी खासदार भगरे यांनी केली. मागील बुधवारी सकाळी दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात तीन तास जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढली असून, तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List