तळनेर येथील शेतकऱ्याची आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या..!
आधुनिक केसरी न्यूज
चिंचोली लिंबाजी : एका ४६ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज व आर्थिक विवचनेला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कडुबा नारायण यडोले (रा. तळणेर ता.कन्नड ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की कडुबा यंडोले हे अल्पभूधारक शेतकरी यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची नासाडी झाली .रब्बी पिकांवर सातत्याने झालेल्या अवकाळी पावसाने केलेला खर्चही उत्पादनात निघाला नाही.डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर व नापिकीने ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते.त्यांच्यावर सहकारी सोसायटी सह खाजगी तसेच बचत गटाचेही कर्ज होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली.हाती पैसा नसल्याने मुलीचे लग्न कसे करावे या विचारत ते नेहमी कुटुंबीयांसोबत बोलत असे .शुक्रवारी ते नेहमी प्रमाणे शेतात गेले होते.मात्र आर्थिक नैराश्यातून त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.गळफास घेतल्याची बाब शेजारच्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली.त्यांनी याबाबतची माहिती सरपंच प्रताप गुजर यांना दिली.प्रताप गुजर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला मात्र येथे डॉक्टर हजर नसल्याने मृतदेह २५ की.मी दूर पिशोर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.तेथे रात्री ८ वाजता डॉक्टरांनी श्वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर तळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक,मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे . पिशोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List