मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार

मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार

आधुनिक केसरी न्यूज

 निलेश मोरे

भिगवण : दि.५ ऊस हंगाम सुरू होताच ऊस वाहतुकीमुळे पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे घडली आहे. या अपघातात किशोर बाळासो साळुंखे (वय ३०, रा. मदनवाडी, विरवाडी नं. २) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.ही घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भिगवण–बारामती रोडवरील मदनवाडी गावच्या कमानीसमोर घडली. फिर्यादी निलेश बाळासो साळुंखे (वय ३३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे भाऊ किशोर हे टीव्हीएस स्पोर्ट (एम एच.४२ ए व्ही ९३२५) या दुचाकीवरून जात असताना, महिंद्रा कंपनीचा अर्जुन ६०५ (एम एच.१८ सिई.७१५३) या लाल ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

धडकेमुळे किशोर साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर मृतदेह पुढील सोयीस्करसाठी “आपुलकी सेवा ॲम्बुलन्स”मधून रुग्णालयात नेण्यात आला.
या प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे हवालदार महेश उगले करत असून सपोनि महांगडे हे प्रभारी अधिकारी आहेत.

 ऊस वाहतुकीत नियमांचे सर्रास उल्लंघन : ऊस हंगाम सुरू होताच परिसरातील रस्ते ट्रॅक्टर–ट्रॉलींच्या ताफ्यांनी गजबजतात, मात्र ही वाहतूक अनेकदा बेदरकार आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे चित्र दिसते. मोठ्याने टेप लावून कर्णकर्कश गाणी वाजविणे, अल्पवयीन मुलांकडून ट्रॅक्टर चालवून घेणे, तसेच रिफ्लेक्टर नसलेल्या व नंबरप्लेट न लावलेल्या ट्रॉली ही आता सर्वसाधारण दृश्ये झाली आहेत. रात्रीच्या वेळी अशा ट्रॉली दिसत नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोक्याची चाहूलही लागत नाही, परिणामी जीवघेणे अपघात घडतात.

पोलीस व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष? स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत असताना पोलीस व आरटीओ विभाग मात्र मौन का बाळगतात?दरवर्षी ऊस हंगामात असे अपघात घडूनही कारवाई केवळ दाखवण्यापुरतीच होते, अशी टीका केली जात आहे.ग्रामस्थांनी रात्रीची गस्त, ट्रॅक्टर तपासणी आणि अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांची मागणी : गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रिफ्लेक्टर, नंबरप्लेट आणि वाहतुकीच्या वेळेवरील नियम कडकपणे अंमलात आणावेत, अशी मागणी केली आहे. “एका निष्काळजी चालकामुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आता तरी जबाबदार विभाग जागे होतील का?” असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई