पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश
आधुनिक केसरी न्यूज
पेठ : पेठ तालुक्यातील उस्थळे शिवारात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांनी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यानंतर वन विभागाकडून सतत जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. सदर बिबट्या वारंवार लोकवस्तीकडे येत असल्याचे जीपीएस कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पष्ट झाले. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी पिंजरा लावण्यात आला. अखेर ४ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास अंदाजे तीन वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रेस्क्यू टीमसोबत वनपरिमंडळ अधिकारी मा. तानाजी भोये, वनरक्षक मजहर शेख, दिलशाद पठाण, भरत चौधरी, कुसुम गवळी तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. तब्बल ३६ तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे उस्थळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List