सुभाष टेकडी परिसरात रस्त्यांचे काम चालू असताना फुटली पाण्याची लाईन;लाखों लिटर पाणी वाया.
आधुनिक केसरी न्यूज
सोनू संजीव क्षेत्रे
उल्हासनगर : उल्हासनगर 4 येथील पॅनल क्रमांक १८ येथे मारुती जाधव यांच्या घरा पासून तक्षशीला शाळे पर्यंत चा रोड बनविण्याचे काम सुरू असताना जेसीबी द्वारा रोड खोदताना पाण्याची लाईन फुटली असताना सुध्दा यांची माहिती कॉन्ट्रॅक्टर यांनी पाणी पुरवठा विभागास न देता काम बंद करून तेथून निघून गेले.ठरलेल्या वेळेवर सायंकाळी ७ वाजता पाणी सुरू झाले असताना अचानक तक्षशिला शाळे च्या गेट जवळ पाण्याच्या फवारा सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशी हेमंत जाधव यांनी ॲड प्रशांत चंदनशिव यांना याची माहिती दिली असता ॲड प्रशांत चंदनशिव यांनी लगेच पाणी पुरवठा विभागातील अभियंता हरेश मिरकुटे यांना माहिती देण्यात आली त्यांनतर त्यांनी पाणी बंद करून सदर ची दुरुस्तीचे काम सुरू केलं असून लवकरात लवकर काम सकाळी पर्यंत पुर्ण करण्यात येईल अशी माहिती अभियंता हरेश यांनी दिली.
एकीकडे सुभाष टेकडी परिसरात पाणी समस्या होती त्यासाठी किती संघर्ष उपोषण सुद्धा करण्यात आले अश्यातच पाईप लाईन फुटली असून सुद्धा पाणीपुरवठा विभागाला सादर माहिती न देता काम बंद केले रोड वर लाखो लिटर पाणी वाया घातला त्यात त्यांनी एक ठिकाणी पाईप लाईन फुटली असून याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडतो. या हलगर्जीपणामुळ सामान्य नागरिकाचे हाल होतात. महानगर पालिका आणि पाणी पुरवठा विभाग मात्र निवांत
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List