सुभाष टेकडी परिसरात रस्त्यांचे काम चालू असताना फुटली पाण्याची लाईन;लाखों लिटर पाणी वाया.

सुभाष टेकडी परिसरात रस्त्यांचे काम चालू असताना फुटली पाण्याची लाईन;लाखों लिटर पाणी वाया.

आधुनिक केसरी न्यूज

सोनू संजीव क्षेत्रे 

उल्हासनगर :  उल्हासनगर 4 येथील पॅनल क्रमांक १८ येथे मारुती जाधव यांच्या घरा पासून तक्षशीला शाळे पर्यंत चा रोड बनविण्याचे काम सुरू असताना जेसीबी द्वारा रोड खोदताना पाण्याची लाईन फुटली असताना सुध्दा यांची माहिती कॉन्ट्रॅक्टर यांनी पाणी पुरवठा विभागास न देता काम बंद करून तेथून निघून गेले.ठरलेल्या वेळेवर सायंकाळी ७ वाजता पाणी सुरू झाले असताना अचानक तक्षशिला शाळे च्या गेट जवळ पाण्याच्या फवारा सुरू झाल्याने स्थानिक रहिवाशी हेमंत जाधव यांनी ॲड प्रशांत चंदनशिव यांना याची माहिती दिली असता ॲड प्रशांत चंदनशिव यांनी लगेच पाणी पुरवठा विभागातील अभियंता हरेश मिरकुटे यांना माहिती देण्यात आली त्यांनतर त्यांनी पाणी बंद करून सदर ची दुरुस्तीचे काम सुरू केलं असून लवकरात लवकर काम सकाळी पर्यंत पुर्ण करण्यात येईल अशी माहिती अभियंता हरेश यांनी दिली. 

एकीकडे सुभाष टेकडी परिसरात पाणी समस्या होती त्यासाठी किती संघर्ष उपोषण सुद्धा करण्यात आले अश्यातच पाईप लाईन फुटली असून सुद्धा पाणीपुरवठा विभागाला सादर माहिती न देता काम बंद केले  रोड वर लाखो लिटर पाणी वाया घातला त्यात त्यांनी एक ठिकाणी पाईप लाईन फुटली असून याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडतो. या हलगर्जीपणामुळ सामान्य नागरिकाचे हाल होतात. महानगर पालिका आणि पाणी पुरवठा विभाग मात्र निवांत

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर  वनमंत्री  यांची मंत्रालयात बैठक टायगर सफारीला मिळणार वेग : आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर  वनमंत्री  यांची मंत्रालयात बैठक
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पास गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली...
अखेर 'गोरेश्वर'वर बाजीरावांनीच मारली "बाजी"
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात तीन दिवसांत गाई-म्हशीचे वासरु व रेडा ठार पशुपालक शेतकरी प्रचंड दहशतीखाली
बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काॅग्रेसचा जन आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन 
सुभाष टेकडी परिसरात रस्त्यांचे काम चालू असताना फुटली पाण्याची लाईन;लाखों लिटर पाणी वाया.
भीषण अपघातात दोन ठार, 11 जखमी  अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुर्घटना