रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल : विजय वडेट्टीवार

रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल : विजय वडेट्टीवार

आधुनिक केसरी न्यूज

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच ६ प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही,ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात.

सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात.हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीषण अपघातात दोन ठार, 11 जखमी  अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुर्घटना भीषण अपघातात दोन ठार, 11 जखमी  अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दुर्घटना
आधुनिक केसरी न्यूज नेवासा  : तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला,...
कसारा घाटात शिवशाहीचा ब्रेक फेल ;चालकाने ४० प्रवाशांचे प्राण वाचविले 
रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल : विजय वडेट्टीवार
सुपा पोलिसांकडून घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारांची बाजारपेठेतून धिंड
चंद्रपूरातील रामनगर पोलीसांनी ४१ गोवंशांना दिले जीवदान
अम्मा की पढाई –विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम :आ.किशोर जोरगेवार
अखेर आदिवासी समाजाची प्रतीक्षा संपली,समाजाच्या न्यायासाठी सरकारचे निर्णायक पाऊल..!