कसारा घाटात शिवशाहीचा ब्रेक फेल ;चालकाने ४० प्रवाशांचे प्राण वाचविले
आधुनिक केसरी न्यूज
प्रा.डॉ.शिवदास हमंद
कसारा : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नि निष्काळजीपणाचा व प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग महाराष्ट्राच्या प्रवाशांनी अनुभवले आहे. याचीच प्रचिती, संभाजी नगर ते बोरवली शिवशाही बसचे कसारा घाटात उतारावर अचानक ब्रेक फेल होऊन बस मधील ४० प्रवाशांच्या हृदयाचे ठोके बंद झाले , तेव्हा आली.
दिनांक ९/६/ २०२५रोजी १.०५ वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्र . एम एच ०६ बी ४३९७ कसारा घाटात स्पीड ब्रेकर वर पुढील ट्रकवर बस आढळल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. बस थांबवण्यासाठी चालक ( क्र. २७१३७ ) दादाराव भागाजी ढकरके व वाहक ( क्र . ५५३८८ ) दत्तु किसन शिरसाट यांनी प्रयत्न केला आणि बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचवले.
छ. संभाजीनगर वरून बोरवली साठी सायंकाळी १७.० वा.सुटणारी बस १८.० वा. च्या दरम्यान उशिराने सुटली. त्या बसचे नाशिकच्या केंद्रीय बस स्थानकावरून २३.३० वाजता बोरवली साठी प्रस्थान झाले. परंतु अचानक कसारा घाटाच्या उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले असता त्यांनी बसची स्पीड कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बसची स्पीड कमी होताच वाहक शिरसाट यांनी धोका पत्करून मागच्या टायर खाली दगडांना टाकून गाडी थांबवली. त्याबद्दल प्रवाश्यांपैकी अजित चवरे , महेंद्र पटेल, रतन चंद्रमोरे, भारत गोसावी, श्रद्धा गोसावी, ठाणे, शिवदास हमंद,जोगेश्वरी, अंधेरी, सायली पोलादे,नाशिक यांनी सर्वांचे प्राण वाचवल्याबद्दल फार फार आभार व्यक्त केले. अचानक गती रोधकवार ट्रकची गती कमी झाल्यामुळे ब्रेक लावले असता प्रेशर तीव्र गतीने कमी होऊन ब्रेक फेल झाले, असे बसचे चालक दादाराव ढकरके यांनी सांगितले.राज्य परिवहन मंत्री महोदयांनी बसेसच्या दुरुस्तीवर लक्ष्य केंद्रित करावे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व डेपो व्यवस्थापकांना या संबंधित गांभीर्याने दखल घेण्या विषयी कारवाई करावी, या प्रकरणाच्या संबंधित छ. संभाजीनगरच्या डेपो व्यवस्थापकांची चौकशी करावी, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List