देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच...

 देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : काँग्रेसने आता बातमी पसरविली की, आताच्या सरकारने पाणीपट्टीत 10 पट वाढ केली.
पण, खरोखर ही वाढ केली कुणी.? 
29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली. ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता तेच आमच्यावर आरोप करतात.

2018 मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते. मात्र 2022 मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता, प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले. त्यामुळे 500 ची वाढ 5000 रुपये झाली.
हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे आणि शेतकर्‍यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यातच त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल.

माझी माध्यमांनाही विनंती आहे की, निवडणुकीत विरोधक फेक नरेटिव्हसाठी बातम्या देत राहतील. पण, त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे.
आता राज्यातील जनतेनेच ठरवावे, सुलतानी सरकार कोणते होते?

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रिसोड नगर परिषदेवर अनंतराव देशमुख यांचे “वर्चेस्व” कायम रिसोड नगर परिषदेवर अनंतराव देशमुख यांचे “वर्चेस्व” कायम
रिसोड: तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे. अतिशय चुरशी समजली जाणारी निवडणुक रिसोड नगर परिषदेवर भाजपचे...
गोंदिया,गोरेगाव, सालेकसात काँग्रेसचा तिरोड्यात भाजपाचा नगराध्यक्ष 
चंद्रपूर जिल्ह्यात मतदारांनी भाजपला नाकारले काँग्रेसला दिला हात
चंद्रपूर  जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
कमळाची हॅटट्रिक : गडचिरोली जिल्ह्यात तीनही नगरपालिकांवर भाजपचा निर्विवाद झेंडा
नगर पालिका निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व
वरोडा नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता अर्चना ठाकरे २७८५मतांनी विजयी..!