चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत

माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती - शेतकरी नारायण सुरे यांच्याकडून धनादेश स्वीकारताना खैरे भावुक

चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरकरांची सेवा चंद्रकांत खैरे करत आहे. सत्तेत असो नसो खैरे मदतीला धावून जातात हा अनुभव अनेकांना आला. आता मात्र निवडणूक असल्याने महागाईच्या झळा सर्वांना बसत आहे. याची जाणीव झाल्याने छत्रपती संभाजीनगरात हर्सूल येथील सर्वसामान्य शेतकरी नारायण सुरे प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाख रुपयांची मदत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सर्वच स्तरातून होईल तितकी मदत करत आहे. त्यामुळे माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती असल्याचे खैरे यांनी सांगितले. अडचणीच्या काळात सर्वसामान्य बळीराजाकडून धनादेश स्वीकारताना खैरे मात्र भावुक झाले. नारायण सुरे यांची हर्सूल परिसरात शेती असून, त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. हरसिद्धी माता मंदीरात सुशोभीकरण कामासाठी मदत केली होती.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट
रिसोड: वाशिम जिल्ह्यात जून पासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून...
करंजी रोड येथे बालकामगाराची सुटका बालकाला कामावर ठेवणे भोवले : मालकावर गुन्हा दाखल
पुण्यातील कोट्यवधींच्या धाडसी घरफोडी नंतर मोहिदेपूर येथील सहा तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात..!
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन
नळदुर्ग जवळ भीषण अपघात: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझर पलटी होऊन, 5 जण जागीच ठार
बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत
तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट