शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 

शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 

आधुनिक केसरी न्यूज 

कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले. शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अभियानांतर्गत चंदगड ते कोल्हापूर निघालेली शिक्षण हक्क यात्रा राधानगरी येथे आली. येथील अंबाबाई मंदिरापासून  रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गोकुळ संचालक व जि. प. सदस्य अभिजीत तायशेटे यांनी १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे शाळातील शिक्षकांची संख्या कमी होणार असून त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला बगल दिली जाणार असल्याचे म्हणाले. यावेळी हिंदुराव चौगले,जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे,  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी शिक्षक नेते विजय देवणे,सुनिल शिंत्रे अभिजित तायशेटे, वसंतराव पाटील,, आर. वाय पाटील,शरद पाडळकर, सुरेश बचाटे, विश्वास राऊत,बडोपंत किरुळकर,शिक्षक समितीचे प्रमोद तौदकर, मधुकर मुसळे, एन. डी. आयरे, शाहू चौगले, प्रकाश कानकेकर, मंगेश धनवडे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. २० एप्रिल २०२६ महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम...
चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश
खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे
पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!
नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला
नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली