पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 

पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके 

पैठण : येथील गोदावरी नदीपात्रात,  दशक्रिया विधी घाट ते गणेश घाटा पर्यंत नदीचे पाणी ओसरल्यानंतर गाळातून सोन्या-चांदीच्या वस्तू सापडतात. अंत्यविधीवेळी मृत व्यक्तीसोबत अर्पण केलेले दागिने (सोने, चांदीची नाणी) पाण्यात विसर्जित केले जातात, जे गाळात अडकून राहते. नाथषष्ठीच्या निमित्ताने किंवा पाणी कमी झाल्यावर लोक हातात चाळण्या, टोपल्या घेऊन नदीच्या गाळात हे सोने शोधण्यासाठी दिवसभर कसरत करतात. अनेक महिला आणि पुरुष चाळण्या आणि टोपल्या घेऊन गोदावरीच्या पात्रात  सोनं शोधण्यासाठी सध्या मग्न आहेत. पैठणच्या नाथषष्ठीनिमित्ताने नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामुळं नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे.गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे,  येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जाते. यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू गाळात सापडतात. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोने शोधतात. काहींना सापडते तर काहींची मेहनत वाया जाते.रोज येवढी संख्या नसते परंतु पाणी कमी झाले अण गोदापात्रात आस पासच्या गावातील मजुराची संख्या वाढली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवगाव फाटा रस्त्यालगत आढळला मृतावस्थेतील बिबट्या देवगाव फाटा रस्त्यालगत आढळला मृतावस्थेतील बिबट्या
आधुनिक केसरी न्यूज  जनार्दन चव्हाण  निफाड : येथील देवगाव फाटा रस्त्यालगत दत्तू कोंडाजी बोचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६/२ मधील...
पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 
पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ; दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या
जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा
भिगवण प्रकरण तापलं ! उद्या इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं ? घनश्याम हाकेंचा सवाल
लाल दहशतीचा शेवट जवळ; 10 कोटींचा इनामी नक्षल नेता ‘देवजी’ शरण
शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकाचा जिवंतपणी सन्मान का नाही ?