खुनाच्या गुन्हातील तिघांना १२ तासाच्या आत अटक मोखाडा पोलिस ठाणे यांची कारवाई..!
आधुनिक केसरी न्यूज
तेजस रोकडे
मोखाडा : तालुक्यातील सातुर्ली गावात किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना घडली असून यातील तीनही दोषींना बारा तासांच्या आत अटक करण्यात मोखाडा पोलिसांना यश आले आहे.नवसू लाडक्या फुपाने (५५) रा. सातुर्ली, यांनी त्याच गावातील काही तरुणांना त्यांच्या शेतालगत असलेल्या नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारू नका असे सांगितल्याने त्याचा राग मनामध्ये धरून आरोपी जितेंद्र जयराम पाटील (३१) रितेश तुकाराम पाटील (२३) प्रमोद चिंतामण वारघडे ( २५) यांनी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी फुपाने याच्या शेतावरील घरी जाऊन शिवीगाळ व दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली ठार केल्याची फिर्याद मृत नवसू फुफाणे यांचा मुलगा सोमनाथ फुफाणे यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दिली . याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू होता.
यानंतर तीनही आरोपी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र मोखाडा पोलीस ठाण्याची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आणि घटनेच्या बारा तासांच्या आत या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. अगदी किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याने मोखाडा परिसरात भीतीचे वातावरण असून कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List