ग्रामस्थांना अपमानास्पद वागणुकी प्रकरणी जांब सरपंच व सरपंच पतीवर गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज
वाशिम : ग्रामपंचायत कार्यालय हे जनतेच्या तक्रारी ऐकण्याचे व न्याय देण्याचे स्थान असताना, त्याच ठिकाणी तक्रारदारांवरच रोष काढणाऱ्या सरपंच व सरपंच पतीने सर्व मर्यादा ओलांडल्याची घटना जांब गट ग्रामपंचायत मध्ये घडली आहे. पावसाचे साचलेले पाणी, दुर्गंधी, व रोगराई यामुळे त्रस्त स्थानिक नागरिकांनी सरळ ग्रामपंचायत कार्यालय गाठून तक्रार केली. मात्र, त्या स्थानिक नागरिकांचे आदराने बोलणे ऐकून घेण्या ऐवजी सरपंच व त्यांच्या पतीने त्यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिली आणि ‘जीवे मारण्याची’ भाषा वापरली.या धक्कादायक घटनेवर स्थानिक पद्मा मोहोड यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, सरपंच सुनीता खिराडे व त्यांचे पती अजय खिराडे (तहसील कर्मचारी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधित अपमानास्पद वर्तनाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.सदर व्हिडिओमध्ये सरपंच व त्यांच्या पतीने सामान्य नागरिकांशी केलेली उद्धट व अपमानास्पद भाषा स्पष्ट ऐकू येते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली, व निवेदन दिले, तर पोलीस स्टेशन ला देखील रात्री उशिरा गुन्हा नोंदवला.सदर घटनेतून
प्रश्न उपस्थित होतो कि, सरपंच पती जो स्वतः तहसील कार्यालयातील कर्मचारी आहे, तो ग्रामपंचायतच्या बैठकीत काय करत होता? आणि शासकीय वेळेत तो या ठिकाणी का उपस्थित होता? तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखी एक गंभीर बाब म्हणजे
*महिला पत्रकाराशी फोनवर सरपंच पतीची केलेली उद्धट व भाईगिरीची भाषा*
एका स्थानिक न्यूज चॅनलच्या महिला संपादिकेने सरपंच पतीशी संपर्क साधताच, त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी देखील अश्लाघ्य व धमकीच्या भाषेत संवाद साधल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीआहे.सदर ग्रामपंचायती वर आधीपासूनच विविध आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असताना, आता नागरिक व मीडिया सोबतही उद्धटपणाचा प्रकार घडल्याने ग्रामपंचायत जांब प्रशासनावरील जनतेचा विश्वास ढासळला आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे की, जे जनतेचे सेवक असावेत, तेच जनतेला धमक्या देतात, अपमान करतात आणि कायद्याचे उल्लंघन करतात. यामुळे आता ग्रामपंचायत जांब बरखास्त करून स्वतंत्र चौकशी समितीमार्फत या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आता यापुढे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग काय कारवाई करतात, याकडे स्थानिक नागरिकांसह जिल्हातील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List