जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला .पैठण येथील नाथसागर धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला . धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे . शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . विनयकुमार राठोड , उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाची पाहणी केली . यावेळी तहसीलदार दिनेश झांपले , पोलीस निरीक्षक व संजय देशमुख , नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ . पल्लवी अंभोरे उपस्थित होते . पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाच्या सुरक्षेची माहिती दिली .  जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या . धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश दिले . अनोळखी व्यक्ती व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. धरणावर नियुक्त कर्मचाऱ्यांची वर्दळ राहणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई