जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला .पैठण येथील नाथसागर धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला . धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे . शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . विनयकुमार राठोड , उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाची पाहणी केली . यावेळी तहसीलदार दिनेश झांपले , पोलीस निरीक्षक व संजय देशमुख , नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ . पल्लवी अंभोरे उपस्थित होते . पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाच्या सुरक्षेची माहिती दिली .  जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या . धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश दिले . अनोळखी व्यक्ती व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. धरणावर नियुक्त कर्मचाऱ्यांची वर्दळ राहणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश 'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
आधुनिक केसरी न्यूजचंद्रपूर : रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीद्वारे आज रविवार दिनांक 11 मे  2025 रोजी 7.00 वाजता रामबाग मैदानावर...
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार
वैनगंगेत बुडालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडून सांत्वन
रामबाग मैदान वाचवले नागरिकांच्या आवाजाला मिळाले यश :आ.किशोरभाऊ जोरगेवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन..!