जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

जायकवाडी धरण सुरक्षेत वाढ,पुढील चार दिवस पर्यटंकाना प्रवेश बंद 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला .पैठण येथील नाथसागर धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला . धरण परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे . शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . विनयकुमार राठोड , उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी धरणाची पाहणी केली . यावेळी तहसीलदार दिनेश झांपले , पोलीस निरीक्षक व संजय देशमुख , नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ . पल्लवी अंभोरे उपस्थित होते . पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाच्या सुरक्षेची माहिती दिली .  जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या . धरणावर यंत्रसामग्री व सायरन बसवण्याचे आदेश दिले . अनोळखी व्यक्ती व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. धरणावर नियुक्त कर्मचाऱ्यांची वर्दळ राहणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे "विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे
आधुनिक केसरी न्यूज गोंडवाना : विद्यापीठाचा एक वेगळा नव उपक्रम "विद्यापीठ आपल्या गावात" मा.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या प्रेरणेतून भौगोलिक,...
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
ब्रेकिंग... नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर उद्या मेगा 15 जून ब्लॉक
बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले
अहमदाबाद याठिकाणी विमान दुर्घटने मुळे राळेगण सिद्धीचे सर्व क्रार्यक्रम केले रद्द
चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक..!