पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 

पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 

आधुनिक केसरी न्यूज 

सिध्दार्थ वाठोरे

हदगाव : तालुक्यातील हरडफ बंधाऱ्यावरुन देवसरी कडे जाताना ४५ वर्षीय युवकाचा पाय घसरून बंधाऱ्यावरून तोल जावून पैनगंगा नदीत वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. 

 संदीप प्रतापराव देवसरकर (४५) असे मृतकाचे नाव असुन तो देवसरी गावाजवळील पैनगंगा नदीवरील हरडफ बंधाऱ्यावर मागील दोन दिवसाअगोदर सायंकाळी ५ वाजता फिरण्यासाठी गेला होता अचानक त्याचा पाय घसरल्याने तोल गेला व तो बंधाऱ्यात कोसळला

 पैनगंगा नदिवर इसापूर धरणावर गेट उघडल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने संदीप हा नदिच्या पात्रात वाहून गेला. याची माहीती देवसरीचे पोलिस पाटील देविदास पंडितराव देवसरकर यांनी उमरखेड पोलिसांना दिल्याने मागील दोन दिवसापासून संदीपचा शोध पोलिस घेत होते मात्र त्यांना यश आले नाही

म्हणून प्रशासनाने यवतमाळ येथील एनडीआरएफच्या पथकाला काल पाचारण केले असता वाहून गेलेला संदीप हा चातारी येथील नदीपात्रातील बंधाऱ्यात एनडीआरएफच्या पथकाला मृत अवस्थेत सापडला संदीपच्या मृत्यूने देवसरी गावावर शोककळा पसरली असून संदीपवर शवविच्छेदन हे जागेवरच करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि. ८ पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव...
अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या चंद्रपूरात
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा सरसावले; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकाच दिवशी तीन सभा..!
धरणे आंदोलनासाठी अधिकृत जागा द्या ! जालना येथील अशासकीय संस्थेच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू भोकर-नांदेड रस्त्यावरील घटणा
विकासकामांच्या जोरावर चंद्रपूर महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस