पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 

पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 

आधुनिक केसरी न्यूज 

सिध्दार्थ वाठोरे

हदगाव : तालुक्यातील हरडफ बंधाऱ्यावरुन देवसरी कडे जाताना ४५ वर्षीय युवकाचा पाय घसरून बंधाऱ्यावरून तोल जावून पैनगंगा नदीत वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. 

 संदीप प्रतापराव देवसरकर (४५) असे मृतकाचे नाव असुन तो देवसरी गावाजवळील पैनगंगा नदीवरील हरडफ बंधाऱ्यावर मागील दोन दिवसाअगोदर सायंकाळी ५ वाजता फिरण्यासाठी गेला होता अचानक त्याचा पाय घसरल्याने तोल गेला व तो बंधाऱ्यात कोसळला

 पैनगंगा नदिवर इसापूर धरणावर गेट उघडल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने संदीप हा नदिच्या पात्रात वाहून गेला. याची माहीती देवसरीचे पोलिस पाटील देविदास पंडितराव देवसरकर यांनी उमरखेड पोलिसांना दिल्याने मागील दोन दिवसापासून संदीपचा शोध पोलिस घेत होते मात्र त्यांना यश आले नाही

म्हणून प्रशासनाने यवतमाळ येथील एनडीआरएफच्या पथकाला काल पाचारण केले असता वाहून गेलेला संदीप हा चातारी येथील नदीपात्रातील बंधाऱ्यात एनडीआरएफच्या पथकाला मृत अवस्थेत सापडला संदीपच्या मृत्यूने देवसरी गावावर शोककळा पसरली असून संदीपवर शवविच्छेदन हे जागेवरच करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट  6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 
आधुनिक केसरी न्यूज   नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत...
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री.कैलास दामू उगले व श्रीमती कल्पना कैलास उगले यांचा सत्कार
पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,पत्नी गंभीर जखमी
आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 
पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा