तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड
रुग्णवाहिका नव्हती, ऑक्सिजन संपला! संतप्त गावकऱ्यांचा आरोप उपचाराअभावी दोन निष्पाप जीवांचा बळी?
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक सडक अर्जुनी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होळी धुलीवंदनाच्या दिवशीच दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन मंगळवार तीन मार्च रोजी सौंदड फूटाळा या गावात घडली. मृतकाचे नाव प्रणय गहाने 14 व सागर गहाने 17असे आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय सौंदड प्रशासनाचे पितळ उघड झाले आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे असे आहे की, जर वेळेवर दोघांनाही उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी या मागणीला घेऊन संतप्त गावकऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचा घेराव करून प्रशासनाच्या विरोधात नाराजगी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच मुले रंगपंचमीनंतर तलावात आंघोळीसाठी गेले होते.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून सौन्दड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गावकरी, डॉक्टरांच्या मते दोघेही कोमामध्ये होते. पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले . आरोप आहे की ऑक्सिजन सिलेंडर रस्त्यातच संपल्याने ही दुर्दैवी घटना घडली. अशी माहिती समोर येत आहे.१२ ते १३ कोटी खर्चून उभारलेली इमारत; पण ना आयसीयू, ना जीवनरक्षक साधने, ना पोस्टमार्टम सुविधा! वेळेत उपचार मिळाले असते तर हे प्राण वाचविले जाऊ शकत होते. असे म्हणणे ही गावकऱ्यांचे आहे. एकंदरीत या घटनेमुळे आरोग्य विभागाचे पितळ उघड झाले आहे. घटनेनंतर रुग्णालयासमोर नागरिकांनी घेराव घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी लागली.ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा करणाऱ्या शासनाचा हा दावा खोटा निघत आहे. दोन निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? फुटाळा गाव आज शोकमग्न आहे; मात्र जबाबदारांवर कठोर कारवाई आणि तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List