शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष

शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष

आधुनिक केसरी न्यूज 

सचिन सरतापे 

म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वी विधानपरिषद आमदारकीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

शेखर गोरे हे सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र अंतिम टप्प्यात धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने गोरे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी शेखर गोरे यांनी ९ जून रोजी कुलकजाई फार्म हाऊस येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार असून आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक भूमिका आणि निवडणुकीसंदर्भातील निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शेखर गोरे नेमकी कोणती भूमिका घेणार, महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र भूमिका जाहीर करणार, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ९ जून रोजी होणाऱ्या बैठकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!