होंडा सिटी कारच्या धडकेत  राजू घाईट यांचा मृत्यू

होंडा सिटी कारच्या धडकेत  राजू घाईट यांचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके 

मानेगाव : कार व दुचाकीच्या अपघातात तिवडी येथिल  राजू घाईट यांना खामगाव येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी माणेगाव येथील पूर्णा नदीवरील नवीन पुलावर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तीवडी येथील  राजू घाईट वय ५० व त्यांचा मुलगा  मंगेश घाईट वय अंदाजे २३ वर्ष आपल्या एम.एच.२८ एस. ९०९३ क्रमांक असलेल्या  दुचाकीने  नांदुरा कडे जात असताना आपल्या नांदुऱ्या वरून जळगाव जामोद कडे  येणाऱ्या  MH01BU8793 क्रमांकाच्या होंडा सिटी कार चे   येरळी  मानेगाव येथील नवीन पुलावर टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण व चार चाकी गाडीने डिवाईडरला जोरदार धडक देऊन नांदुरा कडे जाणाऱ्या टू व्हीलर ला धडक दिली. दुचाकी वरील राजू घाईट व त्याचा मुलगा मंगेश घाईट दोघेही गंभिर  जखमी झाले. त्यातील राजू घाईट यांचा खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याने मृत्यू झाला तर मंगेश घाईत याला उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले. अपघातातील कार बबन पांडुरंग मनोहर यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राजू घाईट यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे तिवडी गावावर शोककळा पसरली असून आजूबाजूच्या गावात सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. "मागील तीन दिवस आधी त्याच ठिकाणी बोलेरो पिकप ने जावेद खान चांद खान राहणार नांदुरा या दुचाकी स्वारास धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला."

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले