पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज

 नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील  सानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी दिनांक 11/ 9/ 2025 रोजी गुरुवारी पहाटे दोन ते साडे दोनच्या सुमारास उलवे येथील त्यांच्या राहत्या घरी घरात कोणी नसताना गळफास घेऊन  आत्महत्या केलेली आहे. या घटनेने नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की स्वप्निल हा नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता त्याच्या पत्नीचा आणि त्याचा किरकोळ  वाद फोनवर झालेला होता  अत्यंत साध्या किरकोळवादातून पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलून घरात कोणी नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे 
 दरम्यान , पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असा होता तो इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच मोठा धक्का बसल्याचे काही पोलिसांनी सांगितले.

 पोलीस खात्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी हा अत्यंत जबाबदारीने काम करत असतो मात्र कधीकाळी कामाचा त्रास व तणावामुळे चिडचिड निर्माण होऊन साध्या किरकोळ भांडणातून देखील असे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे असे प्रकार रोखायचे  असल्यास पोलिसांना  मेडिटेशनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. 

 अनिल गायकवाड 

  मेडिटेशन अभ्यासक

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट  बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट 
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड  सोलापूर : संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीड उपसरपंच गोविंद बर्गे...
भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात
मनपाच्या  दोषी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी
पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
पनोरीतील वृद्ध महिलेच्या खुनातील दोन आरोपी गजाआड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा २०२४ रद्द करा..!
ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध