साक्री शहर भाजपात फुट,शिंदे सेना आणि काँग्रेसची साथ घेत आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री पवारांविरुध्द 'अविश्वास'
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
धुळे : साक्रीच्या राजकारणात इतिहास घडवत भाजपाने नगरपंचायतीत बहुमताने सत्ता मिळविली.मात्र ही सत्ता टिकविण्याच्या नादात नगरपंचायतीतील भाजपात फुट पडली आहे.मनमानी पध्दतीने नगराध्यक्षा काम करीत असल्याचा आरोप खुद भाजपाने केला आहे.विशेष म्हणजे भाजपाने ज्यांची तीन दक्षकांची सत्ता उलथवून लावली होती ते साक्रीच्या राजकारणातील किंग मेकरच्या भूमीकेत सदैव राहिलेल्या नानासाहेब नागरे यांची साथ आता भाजपाला मिळाली आहे.शिंदे सेना आणि काँग्रेसच्च्या एका सदस्याच्या मदतीने उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे गटनेते बापूसाहेब गिते यांनी नगराध्यक्षा सौ.जयश्री हेमंत पवार यांच्याविरुध्द अविद्यास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावामध्ये महत्वाच्या भुमीकेत नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते पंकज मराठे आणि सुमित नागरे हे आहेत.त्यामुळे नगराध्यक्षा सौ.जयश्रींचा पराजय निश्चित मानला जात आहे. साक्रीच्या राजकारणात भाजपामध्येच दोन छुपे गट आहेत,दहिते बापू आणि सुरेशआचा पाटील यांच्यातील सख्य साक्रीकरांना माहित आहे. साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिले अडीच वर्ष दहितेबापू समर्थक यांना नगराध्यक्षपद देण्याचे उरले. त्यानंतरचे अडीच वर्ष सुरेश रामराव पाटील यांच्या समर्थकांना हे पद दिले जाईल असे सांगितले गेले होते.परंतु अडीच वर्षांचा काळ उलटून देखील दहिते समर्थक नगराध्यक्षा सत्तेची खुर्ची सोडायला तयार नसल्याने सुरेशआबा समर्थक नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या आमदार सौ.मंजुळा गावीत आणि नानासाहेब नागरे यांच्याशी संपर्क करत त्यांच्या मदतीने नगरपंचायत काबीज करण्याचा मनसुबा रचला. त्यानुसार सुत्रे हलविण्यात आली.
भाजपाचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष बापुसाहेब गिते, विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांच्यासह भाजपाचे ६,शिंदे सेनेचे ५ आणि काँग्रेसचे १ अशा एकुण १२ नगरसेवकांनी अविश्वासाचा हा प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे काल दि. १८ जून रोजी सादर केला,तसेच कलम ५५ अंतर्गत विशेष सभा बोलविण्याची विनंती केली. त्यानुसार दि.२५ जून रोजी सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नगरपंचायतीच्या कामकाजात सातत्याने अनियमितता होत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी आपल्या प्रस्तावात
साक्री जि. धुळे.स्थाता. २३/२/२०१९
म्हटले आहे की,नगराध्यक्षा जयश्री पवार या नगरसेवकांच्या सुचना न स्विकारता स्वतःच्या मर्जीप्रमाणे मनमानीपणे वाटेल तेव्हा बैठक बोलवितात, नगरसेवकांनी सुचविलेले विषय विषयपत्रिकेत टाकत नाहीत. विकासकामांची देयक मंजुर करण्यास टाळाटाळ करणे व देयके वेळोवेळी न देणे,मार्च २०२४ नंतर सहा महिन्यात एकही सर्व साधारण सभा न घेणे,आदिवासी व दलित वस्ती सुधार विकास निधीचा अपव्यय करणे,प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केल्यानंतर नगरसेवकांना नगरपंचायतीचे कामकाज करतांना विश्वासात न घेणे, शासनाच्या नियमांचे पालन न करणे,वित्तीय व प्रशासकीय नियंत्रणात दिढसाळपणा, त्यामुळे नगरपंचातीच्या उत्पन्न वाढीबाबत प्रगती होत नाही. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास व आलेल्या योजना राचविण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे आदी बाबींचा विचार केला असता नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी नगरसेवकांचा विश्वास गमावलेला असून त्या नगराध्यक्षपदी राहण्यास पात्र नाहीत.असे सदस्यांचे मत झाले आहे.त्यामुळे नगराध्यांविरुध्द महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ५५ अन्वये नियम कालावधीत नगरपंचायतीची विशेष सभा ओलविण्यात यावी व
नगराध्यक्षांविरुध्द अविश्वास प्रस्ताव संमत
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अजेंडा प्राप्त
साकी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाबद्दल दि.२५ जून रोजी सकाळी ११ वाजता अविश्वास असल्याबाबचा अजेंडा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.त्यानुसार आम्ही जे जे सभेला उपस्थित राहतील, त्यांना नोटीस बजावत असल्याची माहिती साक्रीचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी
यांनी दिली
करुन त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी १२ नगरसेवकांनी केली आहे.
अविश्वास प्रस्ताव दाखल करणार्यांमध्ये उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे गटनेते,नगरसेवक बापुसाहेब गीते,महिला व बालकल्याण सभापती संगिता भावसार,
उपसभापती नर्गिसबी पठाण, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती प्रविण निकुंभे,विरोधी पक्षनेते पंकज मराठे नगरसेवक अॅड.गजेंद्र भोसले,कल्पना खैरनार,सोनल सुमित नागरे, सुमित ज्ञानेश्वर नागरे,रेखा सोनवणे,उषाबाई पवार,व राहुल अरविंद भोसले या नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान
नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या
मनमानी कारभाराबाबत पत्रकारांना बोलतांना उपनगराध्यक्ष तथा गटनेते बापूसाहेब गिते म्हणाले की, अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने नगराध्यक्षा पवार यांनी यांनी पदाचा राजीनामा द्यायला पाहिने होता.तसेच त्या कुठल्याही गोष्टी गांर्भीयाने घेत नव्हत्या.सन २०१४ मध्ये केवळ तीन बैठका घेण्यात आल्या. चालु वर्षात देखील केवळ २३ फेब्रुवारी रोजी एकच बैठक घेतली,त्यामुळे नगरसेवकांनी जिल्हाधिकार्याकडे बैठक घेण्याबाबत मागणी केली. ती १३ मे रोजी घेण्यात आली.त्यात स्वतः जिल्हाधिकार्यांनी सभेचा अजेंडा काढला.त्यात सर्व १७ नगरसेवकांनी ठराव मंजूर केले.त्यानंतर
सौं उषाबाई पवार यांना संधी
११ दरम्यान पक्षाच्या विज्ञावान कार्यकर्त्या तथा वार्ड क्र. ३ च्या नगरसेविका उषावाई अनिल पवार यांना आता नगराध्यक्षपदाची संधी देणार असल्याची चर्चा आहे."
जुन महिना उलटून देखील नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी विकास कामांच्या ठरावांवर स्वाक्षर्या केलेल्या नाहीत.आ. अमरिशभाई पटेल यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये साक्रीत महिला व पुरुष स्वच्छतागृहांसाठी निधी दिला होता,मात्र नगराध्यक्षा पवार यांनी आजपर्यंत या कामाची वर्कऑर्डर देखील काढलेली नाही,नगराध्यक्षा पवार हा विकास कामांना सहकार्य करत नाही,वरिष्ठ नेत्यांचे देखील ऐकत नाही.त्यामुळे भाजपा व शिंदे गटाच्या एकुण १२ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List