माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने 

विद्यापीठात स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती मासिक व्याख्यानमालेत केले मार्गदर्शन 

माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने 

IMG-20231129-WA0471आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : माध्यमे बदलतात मात्र बातमीचे स्वरूप कधीही बदलत नाही. कारण सत्य हा बातमीचा मुळ व मुख्य निकष आहे. बातमी ही सत्य असते, बातमीचा सोर्स मात्र पक्का असला पाहिजे. माध्यम कोणतेही असले तरी प्रेझेंटेशनमध्ये बदल होतो, बातमीत नाही. बातमीची भाषा त्या त्या माध्यमांप्रमाणे बदलत असते, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसवांद व वृत्तपत्र विद्या विभागात स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ मासिक व्याख्यानमालेचे बुधवारी 'बातमीचे बदलते स्वरूप' या विषयावर सोळावे पुष्प गुंफताना डॉ. मिलिंद दुसाने बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव सानप तर व्यासपीठावर प्रा. डॉ. संजीवकुमार साळवे, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, डॉ. प्रभू गोरे, प्रा. बसवेश्वर बिरादर, प्रा. रमेश वाघ, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, संदीप घंटे आदींची उपस्थिती होती.   
यावेळी पुढे बोलताना डॉ. दुसाने म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य आदोलनासाठी जनजागृती  करणे ही  पत्रकारितेची भुमिका होती. ती तत्कालिन सरकार विरोधी असायची. मात्र सरकार विरोध म्हणजे पत्रकारिता असे नाही. प्रिंट मीडियामध्ये जागेची, शब्दांची मर्यादा असते. कमी जागेत आशय व्यक्त करणारी बातमी द्यावी लागते. आकाशवाणीमध्ये ऑडिओ पाठवणे त्यावर एडिटिंग करणे ती बातमी किती वेळेची द्यायची हे महत्त्वाचे असते. दूरचित्रवाणीमध्ये काही बातम्या वेळ घालवण्यासाठी दाखवल्या जातात. प्रत्येक बातमी ही संपादकाच्या नजरे खालून जात असते. त्या बातमीची कोणावर तरी जबाबदारी असते. आता सोशल मीडियात पत्रकारिता करताना सर्वांनीच जबाबदारीचे भान ठेऊन काम केले पाहिजे, असे आवाहनही शेवटी डॉ. दुसाने यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. परळी येथे मोहनलालजी बियाणी यांनी मराठवाडा साथी हे वृत्तपत्र सुरू केले. आज हे वृत्तपत्र विभागीय स्तरावर नावलौकिक पावले आहे. पत्रकारिता करताना शब्दांचा खेळ खेळता आला पाहिजे व बातमी लिहीत असताना समाजभानही असले पाहिजे, असे  डॉ. सानप म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित भिंगारे, गायकवाड मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज  संदीप शेलार पुणे : दि.9 मार्च 2026 फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी...
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 
खाजगी वसतीगृहातील मुलीची गळफास लावून आत्महत्या; मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींच्या नातेवाइकांचा नकार 
माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा