वन्य प्राण्यांच्या ञासामुळे शेतकरी हतबल ; शेतीपिकचे अमाप नुकसान

वन्य प्राण्यांच्या ञासामुळे शेतकरी हतबल ; शेतीपिकचे अमाप नुकसान

आधुनिक केसरी न्यूज  

चारठाणा : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय घाट्याचा व बिनभरवशाचाच झाला आहे. त्यात दररोज हरिण, रानडुक्कर, रोही ही कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस करून भर घालत आहे. दिवसेंदिवस डुकरांची संख्या वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. येथील परिसरात अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी पिकांची पिकांची रानडुकराच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येत जंगला लगतच्याच नव्हे तर आता असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान गावाला लागून असलेल्या शेतात सुद्धा होत आहे. 
डोळ्यादेखत उभे पीक रानडुकराचा उपद्रव वाढला असून पायाखाली तुडविले जात असून वन्य जीवांचे कायदे अस्तित्वात असल्यामुळे त्यांना ठार मारण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही परवानगी मिळत नसल्यामुळे या डुकरांच्या कळपांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामतःया  रानडुकराचा बंदोबस्त कसा करायचा या चिंतेत शेतकरी दिसून येत आहे. जंगलातील वन्य जीवांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था वनविभागाकडून व शासनाकडून करण्यात येत नसल्यामुळे हे वन्यप्राणी जंगलातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर तुटून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात कुठलेच पीक लागत नसून यात गरीब शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जंगला लगत नव्हे तर आता  गावाला लागून असलेल्या शेतात सुध्दा रानडुक्कराचा उपद्रव वाढला असून हे पिकाचे नुकसान करीत आहेत. 
आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हंगाम शेतकन्यांसाठी डोकेदुखी व जीवघेणा ठरत असताना त्यात रानडुकराचे कळप शेतकऱ्यांच्या चारठाणा, हानवतखेडा, ब्राम्हणगाव, सावरगाव, मोहाडी,वाडी, जाभरुण, मोठा, दगडचोप, यांच्यासह अनेक परीसरातील ऊभ्या असलेल्या पिकावर डल्ला मारून उभ्या पिकांची वन्य प्राणी नासधूस करून खराब करीत आहेत. अनेकवेळा या रानडुक्कर, रोही,हरिण,या सर्व  वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा तसेच  या वन्य जीव, प्राण्याना अभय अरण्य, खाणपाणची सोय करावी, असे नसल्याने ,वन्य प्राणी  शेतकऱ्यांची  शेतातील पिकाची नासधूस करून खराब करीत या लवकर लवकर बंदोबस्त करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!