विद्यार्थी – शिक्षक आंतरक्रियेचा अनुभवकोश : गुरूजी तू मला आवडला!

विद्यार्थी – शिक्षक आंतरक्रियेचा अनुभवकोश : गुरूजी तू मला आवडला!

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेने आपलेसे केले तर परत आयुष्यभर ते मूल शाळेला दांडी मारण्याचा विचारही करणार नाही. मुलांचे शाळेत मन रमावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी माने सरांनी मुलांना रंगांसोबत खेळवण्याच्या प्रयत्नाने मुलांना शाळा आपलीच वाटली. याचा प्रत्यय आपल्याला ‘अरे, इथे मजा आहे की!’ या पहिल्याच प्रसंगात वाचायला मिळते. आणि या पुस्तकात अजून काय काय… Continue reading विद्यार्थी – शिक्षक आंतरक्रियेचा अनुभवकोश : गुरूजी तू मला आवडला!


शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेने आपलेसे केले तर परत आयुष्यभर ते मूल शाळेला दांडी मारण्याचा विचारही करणार नाही. मुलांचे शाळेत मन रमावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी माने सरांनी मुलांना रंगांसोबत खेळवण्याच्या प्रयत्नाने मुलांना शाळा आपलीच वाटली. याचा प्रत्यय आपल्याला ‘अरे, इथे मजा आहे की!’ या पहिल्याच प्रसंगात वाचायला मिळते. आणि या पुस्तकात अजून काय काय दडलेलं आहे याची आपसूकच उत्सुकता वाचकाला लागते.
विद्यार्थी आणि शिक्षक ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका शिवाय दुसर्‍याच्या अस्तित्वाला अर्थ नाही. या दोन्ही घटकांत सतत आंतरक्रिया होत असते. शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षकावर आपसूकच परीणाम होत असतो. या परीणामाच्या परीपाकातूनच मग अध्ययन – अध्यापन प्रक्रिया रूप घेत जाते. निकोप आंतरक्रियेतून मग ‘गुरूजी तू मला आवडला’ यासारखे पुस्तक आकारास येते.
युवराज माने हे जि. प. शाळा पारडी ता. शेलू जि. परभणी या शाळेतील प्राथमिक शिक्षक आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे ‘उपक्रमशिल शिक्षक’ म्हणून राज्यभर परिचीत आहेत. शाळेतील मुलांना छोट्या छोट्या प्रसंगांतून, कृतीतून ज्ञानेंद्रियांना सतत तत्पर ठेवत मुलांना आनंददायी पद्धतीने शाळेत रमवण्याचे काम ते आनंदाने करतात. मुलांना सतत नाविण्याचा ध्यास लावणारे माने सरांनी मुलांच्या मनात ‘आनंदाचे झाड’ ही संकल्पना रूजवण्याचे काम केले आहे. शाळेतील प्रत्येक मूल हे आनंदाचा अखंड वाहता झरा आहे. त्यालाच ‘आनंदाचे झाड’ संबोधून त्याला फुलवण्याचे काम ते करताहेत. गुरूजी तू मला आवडला हे अशाच प्रयत्नांचा अनुभवकोष आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेने आपलेसे केले तर परत आयुष्यभर ते मूल शाळेला दांडी मारण्याचा विचारही करणार नाही. मुलांचे शाळेत मन रमावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी माने सरांनी मुलांना रंगांसोबत खेळवण्याच्या प्रयत्नाने मुलांना शाळा आपलीच वाटली. याचा प्रत्यय आपल्याला ‘अरे, इथे मजा आहे की!’ या पहिल्याच प्रसंगात वाचायला मिळते. आणि या पुस्तकात अजून काय काय दडलेलं आहे याची आपसूकच उत्सुकता वाचकाला लागते. मुलांना शाळा, शिक्षक आपले वाटावे, शाळेत येताना त्यांच्या मनात भिती न राहता एकप्रकारचा उत्साह राहावा. मुले फुलताना ते आनंदाची झाडं व्हावीत. समाजाला ज्यांचा अभिमान वाटेल अशी मुले घडवण्याचा माने सरांनी केलेला प्रयत्न प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे.
पुस्तक वाचताना पुस्तकाच्या पानापानांवर एका प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या निष्ठावंत शिक्षकाच्या मेहनतीचा गंध दरवळताना दिसतो. खेळातून शिकण्याकडे, संवादसेतू, अस्तित्व सहचरांचं, सहलगाडी, मुलांचा अमूल्य खजिना, नवे मित्र येणार अशा जाणिवपूर्वक राबवलेल्या उपक्रमांतून मुलांना आपण माणूस म्हणून जगताना आपले पर्यावरण, मित्र, अवतीभवतीचे पशू पक्षी यांच्या अस्तित्वाची जाणिव करून देणे खूपच महत्वाचे आहे. झाडे लावण्यासाठी मुलांनी बिया आणने, त्या इवल्या इवल्या हातांनी लावणे, मातीत लपून बसलेल्या बिया काही दिवसांनी बाहेर रूप बदलून बाहेर पडणे हे बालमनाला अत्यंत आनंदाची भरती आणणारे आहे. हाताचे ठसे घेणे, चित्रगप्पांतून बालमन उलगडणे, ज्ञानेंद्रियांना आपले मित्र संबोधून ज्ञानेंद्रियांची करून दिलेली ओळख नाविण्याचा ध्यास घेणाराच करू शकतो.
मुलांचं मन हे टिप कागदासारखं असते. त्यांच्या सभोवती घडणारे बदल, दिसणारे दृश्य, अनुभवलेले प्रसंग ते सतत त्यावर टिपत असतात. अशा मनरूपी टिपकागदावर संस्कारक्षम अनुभवांचे टिपण होत गेले की, आयुष्य समृद्ध होतं. हे टिपकागद समृद्ध अशा अनुभवांनी भरण्याचा लेखकाने सतत प्रयत्न केलेला आहे. शिवार भ्रमंती, चिखलातले मुळाक्षरे, शाळेतलं स्वयंपाकघर, ताटातली आरोग्यशाळा, वर्गसभा, संगे राहू संगे खाऊ, कुतूहलपेटी, बालसभा अशा मुलांना अनुभव संपन्न करणार्‍या उपक्रमांच्या माध्यमातून माने सरांनी मुलांना प्रत्यक्ष अनुभव देत शिकण्याची शिकवण्याची प्रक्रिया आनंदायी केली आहे.
प्रत्येक मूल हे एकापेक्षा वेगळं असतं. प्रत्येकाला स्वतंत्र मन आणि मेंदू असतो. त्याला सतत वेगवेगळ्या कल्पना येत असतात. नवनवे प्रश्न पडत असतात. ते आपल्या कुवतीनुसार विचारही करत असतात. अशा लेकरांना वेळीच योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रमाणात खतपानी मिळाले तर या कल्पनेचे रूपांतर कल्पकतेत होण्यास वेळ लागत नाही. या पुस्तकातील ‘एक क्षण आपुलकीचा’, ‘आरसा मुलांच्या मनांचा’, ‘शाळेच्या अंगणातील कल्पनांची कारंजी’, ‘चित्र – बालमनाचा आरसा’, ‘वाचनसेतू’ यासारखे उपक्रम वाचले की माने सरांनी मुलांच्या मनावर केलेल्या सिंचनाची आपल्याला कल्पना येते.
पुस्तकाला लेखक तथा माजी राज्य प्रकल्प समन्वयक भाऊ गावंडे यांनी दिलेली समर्पक अशी प्रस्तावना आणि वयम मासिकच्या मुख्य संपादक शुभदा ताई चौकर यांनी केलेली पाठराखण
माने गुरूजींच्या या अनुभवकोषाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. माने सरांच्या प्रयास आणि तन्मय या दोन्ही मुलांनी केलेली मुखपृष्ठाची रचना मुलांच्या भावविश्वाला अधिक ठळकपणे प्रदर्शित करणारे आहे. दिलीपराज प्रकाशनने केलेली पुस्तकाची रचना आणि निर्मिती आकर्षक अशी आहे. माने सरांचा हा अनुभवकोष शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने एकदातरी वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा असाच आहे.


पुस्तकाचे नाव : गुरूजी, तू मला आवडला!
लेखक : युवराज माने,
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
गुलाब बिसेन
संपर्क क्र. 9404235191

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..! हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..!
आधुनिक केसरी न्यूज  प्रणव वराडे  लोणार : तालुक्यात काल दिनांक २६ जून रोजी सकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. त्यात बऱ्याच...
गावगाड्यातील पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडणार - आमदार सदाभाऊ खोत 
Breaking News... माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार यांची कन्या,महिला नेत्या,बँकेची माजी संचालक सौ.नंदाताई अल्लुरवार यांचा भाजपात प्रवेश
एसटी ऑटोच्या अपघातात 10 जण जखमी, करडखेड फाट्याजवळील घटना
भीषण... पुन्हा एक पावसाचा बळी! शेतातील माती रस्त्यावर आली, चार चाकी घसरून खाल्ल्या ५ पलट्या ! तरुणाचा जागीच मृत्यू
शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास "जलसमाधी आंदोलन"   
लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे