जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके

जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र माहीत होता. अजितदादांचा अभ्यास अतिशय दांडगा असल्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणावर पकड होती. जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच पुढे येऊन मदत केली आहे. वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर असायचे. कार्यालयीन कामकाज असो  विधिमंडळातील भाषणे असो की सार्वजनिक व्यासपीठावर केलेले मार्गदर्शन असो, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व झळकत होते. अशा या  उमद्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. ही राज्याचीच नव्हे तर देशाची अपरिमित हानी आहे. मंत्रिमंडळातील माझे सहकारी गमावल्याचे अतिशय दुःख आहे. दादांना विनम्र श्रद्धांजली..!

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा...
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन 
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद 
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना
संवेदनशील नेतृत्वाचा अस्त : आ.किशोर जोरगेवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन
साहित्यकृतींतून जगण्यातील अस्वस्थतेची अभिव्यक्ती -‘लेखक संवाद’ कार्यक्रमात कवी-लेखक प्रभू राजगडकर यांचे प्रतिपादन -पदव्युत्तर मराठी विभागात लेखक संवाद कार्यक्रम