सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंठाच्या वतीने आयोजित सहकार जागर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..!
ग्रामीण भागातील पतसंस्थांची कार्यक्षमता वाढली पाहिजे : सचिन वाणी

आधुनिक केसरी न्यूज
जगदीश राठोड
मंठा : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंठा च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साजरी करण्यात येत असून सहकारातून समृद्धीकडे कार्यक्रमांतर्गत प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी यांच्या सहकार जागर या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य,पतसंस्थांचे प्रतिनिधी व सहकार क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश राठोड, बाजार समितीचे सभापती ए जे पाटील बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे, जिल्हा उपनिबंधक पी बी वरखडे, सहाय्यक निबंधक श्रीमती टी ए जाधव, सतीशराव निर्वळ, प्रल्हादराव बोराडे, किसनराव मोरे, पंजाबराव बोराडे, अण्णासाहेब खंदारे,डॉ.दत्तात्रय काकडे,श्रीधर सरकटे,शरद बोराडे, गणेशराव बोराडे,प्रकाश घुले,बाजार समितीचे सचिव रमेश बोराडे यांची उपस्थिती होती.प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमदार राजेश राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील सोसायट्यांचा पतसंस्थांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व छोट्या व्यवसायिकांना त्याचा लाभ मिळू शकतो असे सांगितले. प्रमुख व्याख्याते आणि प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी यांनी सहकार जागर या विषयावर व्याख्यान देताना सांगितले की, स्वच्छ उद्देश ठेवून गरजवंत लोकांनी पतसंस्थेची स्थापना केली पाहिजे यामध्ये शेअर कॅपिटल जास्त व सभासद संख्या कमी असेल अशा पतसंस्थेची प्रगती व्हायला वेळ लागत नाही, कोणतीही पतसंस्था अडचणीत येणार नाही याकडे सभासद व ठेवीदारांनी लक्ष देणे तितकेच गरजेचे असून पतसंस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची असल्याचे सचिन वाणी यांनी सांगितले.
पतसंस्थांनी ठेवीदारांचे हित जोपासून प्रगती साधावी असे ते म्हणाले.याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक पी बी वरखडे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की,आपली बँक किंवा पतसंस्था सुरक्षित कशी ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे, सहकारातून समृद्धीकडे हा कार्यक्रम देश पातळीवर सुरू असून पहिल्या टप्प्यात 12000 व दुसऱ्या टप्प्यात तीन हजार सोसायटीचे संगणकीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागातील सोसायटी आज डबघाईला आलेल्या असून शासनाने सहकार कायद्यात अनेक नवीन दुरुस्त्या केल्या आहेत त्यामध्ये नळदुरुस्ती, शेतकऱ्यांना खत व बी बियाणांचा पुरवठा, सोसायटी मार्फत सेतू सुविधा केंद्र तसेच जन औषधी केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन सोसायटीची प्रगती कशी होईल याविषयी मार्गदर्शन केले. बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे म्हणाले की,आज तालुक्यातील पतसंस्थांची आर्थिक क्षमता कमकुवत असून पतसंस्था आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत कारण प्रत्येक संस्थेला अडचणी येत असतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो यासाठी सहकार चळवळ वाचविणे तेवढेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहाय्यक निबंधक मंठा श्रीमती टी ए जाधव यांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून वर्षभर सहकार जागर चळवळ राबवून सहकार क्षेत्र गतिमान करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक अधिकारी सी.जी.घावटे, डॉ.रमेश बोराडे,सचिन बोराडे,श्रीमती वाघमारे,बालाजी कुलकर्णी, शाम हजारे,शिवसिंग छानवाल,रावसाहेब मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप देशमुख यांनी केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News

Comment List