निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला..!
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा गेल्या चार महिन्यापासून पैनगंगा नदी पात्राला पाणी नसल्यामुळे खंडित होता. आठवडाभरात चालू असलेल्या सतत धार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहताना पहावयास मिळत आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या सतत पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहताना पाहावयास मिळत आहे.
मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई पुणे हैदराबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असत पण धबधबा खंडित झाल्याने पर्यटकांचा हिरमोडच झाला होता.सद्यस्थितीत या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही लॉजिंग सारखी किंवा रिसोड सारख्या सुविधा नसल्यामुळे या पर्यटन स्थळाचा पुरेपूर पर्यटकांना आनंद घेता येईना. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या कालावधीमध्ये या पर्यटन स्थळाच्या विकासाना चालना मिळाली होती पण त्यानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष न दिल्यामुळे या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले यांनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष वेधावे अशी मागणी या भागातील जनतेतून पुढे येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List