अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक अन वाहनांची जाळपोळ...

अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक अन वाहनांची जाळपोळ...

आधुनिक केसरी न्यूज 

अकोला : जुने शहर येथील हरिहरपेठ भागात किरकोळ कारणावरून दोन गटात मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या वादातून तुफान दगडफेक करण्यात आली. एक ऑटो रिक्षा व तीन दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर चोख बंदोबस्त तैनात केला असून संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जुने शहरातील हरिहरपेठ भागात ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे मोठ्या वादात पर्यवसान झाले. या वादावरून गाडगे नगर व हमजा प्लॉट येथील दोन मोठे गट आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली. यामुळे घटनास्थळी दगडचा खच पडला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने एका ऑटो रिक्षा व तीन दुचाकीला आग लावली. या आगीमध्ये चारही वाहने जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळ व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, शहरात शांतता आहे, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!  नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार