आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा...

आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा...

आधुनिक केसरी न्यूज 

डहाणू : डहाणू तालुक्यातील रणकोळ येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांची शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना काल रात्री (दि.५) जेवणामधून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ऐने प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा उपजिल्हा रुग्णालय, वानगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काल रात्री रानशेत शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना जेवण झाल्यानंतर मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . त्यानंतरही बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने रात्रीचे जेवण तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.

शासकीय आश्रम शाळा रानशेत येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचे कारण शोधण्यासाठी शाळेतील पिण्याचे पाणी तसेच रात्रीच्या जेवणाचे नमुने ताब्यात घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. : संदीप गाडेकर, आरोग्य अधिकारी डहाणू.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग