ओबीसी नेते हाके यांना सरकारच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासन... कुणावरही अन्याय...

ओबीसी नेते हाके यांना सरकारच्या शिष्टमंडळाने दिले आश्वासन... कुणावरही अन्याय...

.

आधुनिक केसरी न्यूज 

जालना : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल  हे यावेळी उपस्थित आहेत.
शिष्टमंडळाने श्री. हाके व श्री. वाघमारे यांच्यासमवेत त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. श्री. महाजन म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारशी अवश्य चर्चा करावी. जेणेकरुन त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल. शासन आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करु नये. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती यावेळी उपोषणकर्त्यांना करण्यात आली. 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार  समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि. 28/6/2026 नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात एक चार...
गद्दार खासदारांची गाढवावरून धिंड..! 
नागभीडमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांमध्ये वाढ; पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी..!
विजेच्या धक्क्याने खेर्डा खुर्द येथील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील पहिला बळी..!
दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप