वेळेवर निदान व उपचार झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ मुकुल   घरोटे ; वाचा तज्ञ काय सांगतात..

वेळेवर निदान व उपचार झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ मुकुल   घरोटे ; वाचा तज्ञ काय सांगतात..

आधुनिक केसरी न्यूज 

 किशोर पाटणी

शिर्डी   -  वेळेवर उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान उपचार होणे गरजेचे आहे. कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करत त्या आजारातून बाहेर पडावे असे आव्हान साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमधील कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद घरोटे यांनी सांगितल. साईबाबा संस्थानच्या त्रि सदस्य समितीच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षापासून शिर्डी येथे दर शनिवारी  कॅन्सर उपचार मार्गदर्शन व भिजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले,  असून गेल्या वर्षभरात जवळपास १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, सध्या पुरुषांमध्ये मुखरोग व फुफ्फुसाचे कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन अंडकोषाचा कॅन्सर दिसून येतो. पण वेळेवर लक्षणे दिसताच उपचार घेण्यासाठी मोठी गरज आहे. गर्भपिशवीचा कॅन्सर लसीकरण यासंबंधी माहिती दिली. निरोगी आरोग्यदायी आहार त्याचबरोबर जीवनशैलीत सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले. कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचा बळी जात आहे. वेळेवर निदान उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनत आहे.  अशी खंत व्यक्त केली रुग्णांनी वेळेवर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर शनिवारी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुकुंद खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार मार्गदर्शन व फीजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले आहे. वर्षभरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेऊन साईंच्या आशीर्वादाने ते बरे झाले आहे. त्यासाठी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग