लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात 

सुधाकर अंबोरे व राहुल तायडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात 

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजनराव तायडे यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यावेळी उपस्थित होते. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस विचार घरोघरी पोहचवा असे आवाहन केले.

काँग्रेस पक्षाची विचारधारा हीच शाश्वत असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विजयाचे एक एक शिखर पार करत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने  काँग्रेस पक्षाला कौल दिला. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात दैदिप्यमान कामगिरी करत काँग्रेस हाच पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्वात जास्त जागा जिंकून विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवू”, असा विश्वास प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवगाव फाटा रस्त्यालगत आढळला मृतावस्थेतील बिबट्या देवगाव फाटा रस्त्यालगत आढळला मृतावस्थेतील बिबट्या
आधुनिक केसरी न्यूज  जनार्दन चव्हाण  निफाड : येथील देवगाव फाटा रस्त्यालगत दत्तू कोंडाजी बोचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६/२ मधील...
पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 
पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ; दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या
जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा
भिगवण प्रकरण तापलं ! उद्या इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं ? घनश्याम हाकेंचा सवाल
लाल दहशतीचा शेवट जवळ; 10 कोटींचा इनामी नक्षल नेता ‘देवजी’ शरण
शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकाचा जिवंतपणी सन्मान का नाही ?