सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल

 सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल

 आधुनिक केसरी न्यूज 


मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी सुनावले आहे. ते  माध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचं काम केले आहे. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे.

महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केलं? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती,” असे टीकास्र रामदास आठवलेंनी सोडले.
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाण होईल, असे वाटत नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटले.
इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे ठिक नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुंबई 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज  संतोष पाटील  मुंबई : मुंबई ही देशाची 'एंटरटेनमेंट कॅपिटल' आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
२५१५ योजनेत ६.९५कोटींचा बनावट शासन आदेश! आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी
काळे फासणाऱ्या इसमाचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद
वारणाली येथील मल्टीस्पेशालिटी दवाखान्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचना; तर काळ्याखाणी मधील कारंजे १५ ऑगस्ट पर्यंत सूर होणार
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची तस्करी ; ५ संशयित ताब्यात तर १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; महात्मा गांधी चौक पोलिसांची कामगिरी
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा