सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी सुनावले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केलं? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती,” असे टीकास्र रामदास आठवलेंनी सोडले.
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाण होईल, असे वाटत नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटले.
इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे ठिक नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar
![](https://www.adhunikkesari.com/media-webp/2022-07/mahaveer-new.jpg)
![Adhunik Kesari Subscribe](https://www.adhunikkesari.com/media-webp/2024-04/adhunik-ad.jpeg)
Comment List