जनता जनार्धनाचा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ अशोक उईके

जनता जनार्धनाचा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ अशोक उईके

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : देशाला विश्वगुरू करण्याचा संकल्प करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प जनता जनार्धनाला समर्पित आहे.या अर्थसंकल्पात विरोधकांना टीका करायला कुठलीच संधी दिलेली नाही. शेतकरी, युवा, महिलासाठी विशेष योजना, बी-बियाणे स्वस्त तर खत कारखाने निर्मितीचे आश्वासन दिलासादायक असून काही औषधे स्वस्त करण्याचा निर्णय स्वागताचा आहे.आदिवासी कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे नियोजन आहे. ग्रामीण भागात रोजगार, प्रामुख्याने 5 लाख मागास महिलांना फायदा देण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांसाठी 5 वर्षाचे नियोजन केले आहे. हा करमुक्त अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकरी, महिला, तरुणासाठी अनेक घोषणा केल्या असल्याने चौफेर ऊर्जा देणारा अर्थसंकल्प असेच म्हणावे लागेल.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. गोपाल मुंधडा यांचे निधन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, संवेदनशील समाजसेवक, दूरदृष्टी असलेले पर्यावरणप्रेमी आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारे डॉ. गोपाल मुंधडा...
महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन