पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक..!

पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक..!

आधुनिक केसरी न्यूज 

जळगाव जा : भाजपा नेते आ डॉ.संजयभाऊ कुटे हे स्वतः पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.मतदार संघात कुठल्याही बड्या नेत्याची सभा घेतली नाही.स्वतःच प्रचाराची धुरा सांभाळून स्वतःसह पश्चिम वर्हाडातील महायुतीच्या उमेदवारांनाही निवडून आणले.पश्चिम वर्हाडात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुक्ष्म नियोजन  केले.व पश्चिम वर्हाडातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजय मिळविला.आज भाजपचे दिग्गज नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग ५ वा विजय मिळवल्याबद्दल यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
महायुतीने राज्यात केलेली लोककल्याणकारी विकासकामे आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या समर्थ नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे यश आहे.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी केलेल्या कष्टातून हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने आणलेल्या 'लाडकी बहीण'सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पाठींबा देत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केले, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभारही यावेळी महायुतीच्या वतीने प्रदेश पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले डाॅ संजय कुटे यांनी मानले.यावेळी आ डॉ.संजय कुटे यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा पण सोबत होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..!  नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून महेश पाटील यांची बदली झाली असून ते पुणे येथे सारथीचे...
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!
खोटारड्या भाजपा सरकारकडून बळीराजाचा विश्वासघात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ
वडीगोद्री परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; गाय व शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
समृद्धी महामार्गावरील अपघातात  चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जण ठार