एकाच वेळी सात जणांना अग्निदाह ; वारकऱ्यांचे अपघाती निधन ; चनेगाव,तपोवन ,खामखेडा गावांवर शोककळा

जनसमुदाय गहिवरला,गावात चूल पेटली नाही

एकाच वेळी सात जणांना अग्निदाह ; वारकऱ्यांचे अपघाती निधन ; चनेगाव,तपोवन ,खामखेडा गावांवर शोककळा

आधुनिक केसरी न्यूज 

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: जालना-राजुर महामार्गावर वसंतनगर जवळ 18 जुलै रोजी दुपारी पाचच्या सुमारास आषाढी वारीहून घरी परतत असताना काळीपिवळी टॅक्सी रस्त्यालगतच्या विहरित पडून सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे चनेगाव,तपोवन ,खामखेडा या गावांवर शोककळा पसरली होती. दिनांक 19 जुलैला सकाळी शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.एकाच वेळी सात जणांना अग्निदाह देतांना उपस्थित शोकाकुल जनसमुदाय गहिवरला होता.यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांना अश्रूं अनावर झाले होते.दुःखद घटना घडल्याने गावांत चूल पेटली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
 
आठरा जुलै रोजी दुपारच्या वेळी आषाढी वारीहून घरी परतत असतांना  राजूर-जालना महामार्गावर वसंतनगर जवळ काळी-पिवळी विहिरीत पडून सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता यामध्ये बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील प्रल्हाद महाजन,नंदा तायडे,नारायण निहाळ,प्रल्हाद बिटले, चंद्रभागा घुगे यांचा तर भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील ताराबाई मालुसरे व खामखेडा येथील रंजना कांबळे अशा एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता.शुक्रवार रोजी सकाळी नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अपघात घडल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते.तर मृतांचे शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदन करण्यात आले होते.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 19 जुलै रोजी  सकाळी शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक, व्यापारी,शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी सज्ज  ११५० जादा बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी सज्ज  ११५० जादा बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव मुंबई : (२७ आक्टोबर)  कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्ताने  श्रीक्षेत्र पंढरपुर येथे जाण्यासासाठी   एसटी महामंडळ  सज्ज असुन...
भिगवण कृषी उत्पन्न उपबाजारात आडतदारांचा अचानक संप; शेतकरी नाराज 
काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील
अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण
दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू! गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश
भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत