विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याचा आरोप होता. तीचे जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दल आपत्तीजनक पोस्ट केलेल्या दिसत होत्या. जैनब हिच्याबद्दल बीसीसीआयकडे एका वकीलाने तक्रार केली होती. त्यामुळेच जैनब अब्बास हिला भारत सोडावा लागला. 

पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘समा टीवी’ ने जैनब अब्बल हिच्याबाबत एक्स खात्यावर पोस्ट केली आहे.  जैनब अब्बास हिने भारत सोडला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जैनबला भारत सोडावा लागला. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारताविरोधीत ट्वीटचा आरोप आहे. 

विनीत जिंदल नावाच्या भारतीय वकिलाने बीसीसीआयकडे जैनबची तक्रार केली होती. विनीत जिंदाल याने ट्वीट करत तक्रारीचे पत्रही पोस्ट केले आहे. विनीत जिंदालचे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय आहे. विनीत जिंदाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की बीसीसीआय आणि गृह मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारीमध्ये जैनाब अब्बास हिला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्रजेंटर म्हणून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जैनबने भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध अपमानास्पद आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या आहेत. ‘अतिति देवो भव’ हे फक्त आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करणाऱ्यांसाठी आहे, पण भारतविरोधी स्वागत नाही.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते...
माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड