विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याचा आरोप होता. तीचे जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दल आपत्तीजनक पोस्ट केलेल्या दिसत होत्या. जैनब हिच्याबद्दल बीसीसीआयकडे एका वकीलाने तक्रार केली होती. त्यामुळेच जैनब अब्बास हिला भारत सोडावा लागला. 

पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘समा टीवी’ ने जैनब अब्बल हिच्याबाबत एक्स खात्यावर पोस्ट केली आहे.  जैनब अब्बास हिने भारत सोडला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जैनबला भारत सोडावा लागला. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारताविरोधीत ट्वीटचा आरोप आहे. 

विनीत जिंदल नावाच्या भारतीय वकिलाने बीसीसीआयकडे जैनबची तक्रार केली होती. विनीत जिंदाल याने ट्वीट करत तक्रारीचे पत्रही पोस्ट केले आहे. विनीत जिंदालचे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय आहे. विनीत जिंदाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की बीसीसीआय आणि गृह मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारीमध्ये जैनाब अब्बास हिला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्रजेंटर म्हणून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जैनबने भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध अपमानास्पद आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या आहेत. ‘अतिति देवो भव’ हे फक्त आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करणाऱ्यांसाठी आहे, पण भारतविरोधी स्वागत नाही.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रकांत पतरंगे  गडचिरोली : शहरातील कारगील चौक परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून घरातील गिझरमधून लागलेल्या...
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती