पोल्सन बटर जगभर गाजलेला ब्रँड नाहीसा,कसा झाला जाणून घ्या...

पोल्सन बटर जगभर गाजलेला ब्रँड नाहीसा,कसा झाला जाणून घ्या...

आधुनिक केसरी न्यूज

राजरत्न भोजने

छत्रपती संभाजीनगर : पोल्सन बटर एकेकाळी  गाजलेला ब्रँड. या ब्रॅंडने आपली जगभर क्रेझ बनवली.मात्र आपण त्याच पोल्सन बटर बद्दल जाणून घेवूया,पोल्सन बटर प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं नाव अचानक कसे नाहीसे झाले.

१९४० मध्ये पोल्सन बटर कंपनी पेस्टनजी एडूल यांनी १३ व्या वर्षी स्थापन केली.या काळात अमूल हे नाव कोणालाच माहीत नव्हते.प्रत्येक भारतीयांच्या मुखामध्ये पोल्सन बटर हा ब्रँड गाजलेला होता.

पेस्टनजी एडूल यांनी एका छोट्याशा दुकानात कॉफीचा व्यवसाय सुरू केला.१२ वर्षानंतर त्यांनी भव्य कंपनी उभी केली.एडूलजी याच निकनेम पॉली होते.कारण, ब्रिटिश काळ असल्याचे जास्त कस्टमर ब्रिटिश असायचे म्हणून त्यांना पॉली नावाने ओळखू लागले. याच नावाने त्यांनी पोल्सन बटर या कंपनीला नाव देण्याचा निर्णय घेतला.

पोल्सन कंपनी कॉफी साठी प्रसिद्ध असल्याने फ्रेंच रेसिफी म्हणून ओळख जगभर मिळाली.नंतर १९१० मध्ये एडूलजी यांनी ब्रिटिश आर्मी साठी बटर सप्लाय करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी ब्रिटिश भारतीय आणि अमेरिकन सैन्याला पोल्सन बटर आणि पोल्सनची शुद्ध कॉफी पुरवली.त्यांच शिखरावर ते दररोज ५ टन लोणी तयार करत होते.आणि सैन्याला मागणीची पूर्तता करण्यासाठी परिणाम मुंबईत नविन कारखाना १९१५ मध्ये सुरू करण्यात आला.

पोल्सन त्यांच्या मलाईला काही दिवस आंबट ठेवण्यासाठी ओळखले जात असे आणि त्या शिळ्या मलाईवर मीठ घालून त्यावर प्रक्रिया करून बटर बनवले जात असे,यामुळे प्रतिस्पर्धी ब्रँड अमूलचे फ्रेश क्रिम बनवलेले बटर बाजारात फ्लॉप झाले.कारण ग्राहकांना पोल्सनच्या चवीची खूपच सवय झाली.

मोठ्या ग्राहकांना प्रोत्साहन म्हणून ब्रँड पुरस्कार म्हणून गिफ्ट कुपन देत असे,१९४५ पर्यत पोल्सन एक ब्रँड म्हणून भरभराट होत होता.आणि दरवर्षी ३ दशलक्ष पौंड लोणीचे विक्रमी उत्पादन गाठले होते.

सरकारच्या पाठिंब्याने त्यांनी स्थापन केलेल्या मक्तेदारीमुळे शेतकरी त्यांचे दूध इतर विक्रेत्याला बाजारात विकू शकत नव्हते.स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय राष्ट्रवादी नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात आणून दिले.सरदार वल्लभभाई पटेल जे १९४२ पासून सहकारी संस्था उघडण्याच्या कल्पनेशी खेळत होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४६ मध्ये शेतकऱ्यांसोबत सहकारी चळवळ सुरू केली.त्यामुळे अमूलची स्थापना झाली.१४ डिसेंबर १९४६ रोजी एक प्रतिस्पर्धी आणि दुग्ध सहकारी व्यवसायातील या घसरणीमुळे पोल्सन मुख्य प्रवर्तक सुशीला आणि जगदीश अमोल कपाडिया यांनी विकत घेतला.इथून पुढे अमूलची सुरुवात झाली.हळूहळू पोल्सनला मागे टाकत पोल्सन बटर नाहीसा झाला.आणि अमूल बटरने जगभर मोठा ब्रँड उभा केला.आणि आज रोजी अमूल बटर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार